शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कांदिवली आत्महत्या प्रकरण; शवविच्छेदन अहवालानंतर ‘त्या’ मृत्यूचे गूढ उकलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 00:55 IST

दोन मुलींपैकी लहान मुलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावली, त्यामुळे घुसमटून तिचा मृत्यू झाला तर मोठीला गळा दाबून मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई : दोन मुलींची हत्या करत त्यांचे वडील अजगर अली जब्बार अली उर्फ बबली (४५) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुलींच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा तपास अधिकारी करत असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

अली यांच्यासह त्यांच्या दोन मुली कनेन (१३) आणि सुझेन (८) यांचे मृतदेह कांदिवलीतील त्यांच्या कारखान्यात गुरुवारी सापडले. आर्थिक चणचण तसेच किडनीच्या आजारातून ग्रस्त असल्याने निराशेत त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या जवळ सापडलेल्या सुसाइड नोटवरून प्रथमदर्शनी वाटत असले तरी कांदिवली पोलीस या प्रकरणाची शहानिशा करत आहेत. अली यांनी मुलींना मारले की कोणा अन्य व्यक्तीचा या हत्येमध्ये सहभाग आहे, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

दोन मुलींपैकी लहान मुलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावली, त्यामुळे घुसमटून तिचा मृत्यू झाला तर मोठीला गळा दाबून मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही मयत मुलींचे शवविच्छेदन अहवाल अद्याप आम्हाला मिळालेले नसल्याने मृत्यूचे नेमके कारण समजल्यानंतरच संबंधित व्यक्तीविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, पोलीस याबाबत अली यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींचे जबाब नोंदवत असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस