शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 11:00 IST

Corona Vaccine: बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबई: कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, मुंबईतील बनावट लसीकरणाच्या प्रकरणाने राज्यसह देशभरात खळबळ उडवून दिली. बनावट कोरोना लसीकरणाप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले असल्याचे सांगितले जात आहे. या बनावट लसीकरणात नागरिकांना चक्क मिठाचे पाणी दिले गेल्याचे समोर आले आहे. (in kandivali fake vaccination racket residents get saline water dose in place of corona vaccine)

कोरोना प्रतिबंधक लसीच्याऐवजी मिठाचे पाणी (सॅलाइन वॉटर) देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, बनावट लसीकरण केलेल्या सर्वांची अँटीबॉडी टेस्ट केली जाईल. तसेच या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यात येतील. 

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय; आमदार अतुल भातखळकरांचे टीकास्त्र

बोगस लसीकरणातील मास्टरमाइंडची शरणागती

कांदिवली बोगस लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याचा जामीन दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे बोगस लसीकरण करण्यात आले होते. 

कोविनवर डेटा उपलब्ध नाही

बनावट लसीकरणादरम्यान एका केंद्रात ३९० जणांना १२६० रुपये दर आकारून लस देण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही माहिती कोविन अॅपवर अद्ययावत केली गेली नाही. बनावट लसीकरण प्रकरणात आतापर्यंत सुमारे २०४० लोकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. 

“जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन भाजपचा थेट सवाल

दरम्यान, बनावट कोरोना लसीकरणाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. काही घोटाळेबाज पैसे कमवाण्याच्या दृष्टीने लोकांच्या जीवाशी खेळत होते. सरकारने अशा घटनांची चौकशीची करुन अहवाल सादर करावा. या रॅकेटमधून कोरोनाकाळात लोकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधणाऱ्यांचा तपास करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. लसीकरणात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकाने गंभीर दखल घ्यावी आणि तपासात उशीर करू नये. राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने फसवणूक किंवा बनावट लसीकरण मोहिमांच्या घटना टाळण्यासाठी धोरण तयार करावे. जेणेकरून कोणत्याही निष्पाप लोकांना त्रास होणार नाही. सर्वांत दुर्दैवी भाग म्हणजे कोरोनाच्या काळातही लोक त्रस्त आहेत आणि काही लोक फसवणूक करत आहेत. हे अकल्पनीय आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई