शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

लुडो खेळण्यापासून रोखल्यानं दोन बहिणींनी घर सोडलं; हैदराबाद गाठलं, मुंबईत करायची होती नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 10:51 IST

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दोन मुलींच्या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांना भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दोन मुलींच्या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांना भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना लुडो गेम खेळण्यापासून रोखलं. याचा मुलींना इतका राग आला की त्यांनी मध्यरात्री कुणालाही न सांगता घर सोडलं. 

जयपूरच्या मुहाना मंडीतील एका फळ विक्रेत्यानं आपल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ दिवसांच्या शोधानंतर दोन्ही अल्पवयीन मुली अहमदाबाद स्टेशनवर सापडल्या. लुडो गेम खेळण्यापासून वडील रोखत असल्यानं मुली नाराज झाल्या आणि याच गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांना भेटण्यासाठी त्या घरातून पळून गेल्या. जयपूरच्या मुहाना पोलिसांनी अहमदाबाद जीआरपी पोलिसांच्या मदतीने दोघांना मुंबईला जात असताना स्टेशनवर पकडलं. यापूर्वी दोघीही हैदराबादला गेल्या होत्या.

२९ ऑक्टोबर रोजी मुहाना मंडीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीस सतत शोध मोहीम राबवत होते. त्याचवेळी अनुक्रमे १६ व १४ वर्षांच्या या दोन मुली २८ ऑक्टोबरच्या रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. रात्री दीड वाजेपर्यंत दोघांनाही हॉलच्या बाहेर झोपलेलं पाहिल्याचं वडिलांनी सांगितलं, त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास दोघेही बेपत्ता झाल्या होत्या.

लुडोसाठी घर सोडलंऑनलाइन लुडो गेम खेळल्यावरुन घरात वडिलांसोबत वाद झाल्यानं हैदराबाद आणि मुंबईतील आपल्या मित्रांना भेटायला गेल्याचं पोलिसांच्या चौकशीत दोन्ही मुलींनी सांगितलं. घरातून बाहेर पडताना त्यांनी गेमशी संबंधित मित्रांशी संपर्क साधला आणि हैदराबाद आणि मुंबईला जाण्याचा प्लॅन बनवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही मुलींनी घरातून सुमारे साडेतीन हजार रुपये घेतले आणि आधी हैदराबाद गाठलं. त्याचवेळी दोघीही ऑनलाइन लुडो गेम खेळणाऱ्या त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचल्या, त्यानंतर दोघांनीही तिथे राहण्यासाठी भाड्याने खोली पाहण्याचा प्रयत्न केला.

इन्स्टाग्राम मेसेजनं पकडलंदरम्यान, लुडो खेळणाऱ्या मैत्रिणींच्या मोबाईलवरून एका मुलीनं तिच्या मावशीला १ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला, त्यानंतर काकूने बेपत्ता भाचीच्या मेसेजची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मेसेजवरून लोकेशनची माहिती गोळा केली. लोकेशनच्या आधारे पोलिसांचं एक पथक हैदराबादला पोहोचलं पण यादरम्यान दोन्ही बहिणी ट्रेनमध्ये बसून मुंबईला जाण्याचा विचार करत होत्या. दरम्यान, लहान बहिणीला जयपूरला यायचं होतं मात्र मोठ्या बहिणीला मुंबईला जाऊन नोकरी करायची होती. दरम्यान, पोलीस त्यांचा सतत पाठलाग करत होते आणि मुंबईच्या दिशेनं निघण्यापूर्वी पोलिसांच्या पथकानं जीआरपीशी संपर्क साधून बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन बहिणींना मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमधून उतरवलं आणि गुरुवारी जयपूर पोलिसांनी दोन्ही बहिणींना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी