शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वारंवार मीडियासमोर बोलणं योग्य नाही, दाभोलकर-पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने झापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:04 IST

दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले.

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी नवीन आरोपी पकडले म्हणून आधीच्या आरोपींचा तपास न करण्याची चूक करू नका. त्यामुळे दिशाभूल केली जाऊ शकते असे हायकोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले. त्याचप्रमाणे दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने तपास यंत्रणांसह दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांना झापलं आहे. या प्रकरणासंदर्भात वारंवार मीडियासमोर जाऊन बोलणं योग्य नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा अहवाल आज हायकोर्टात सादर करण्यात आला. यावेळी पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका असं कोर्टाने एसआयटीला खडसावलं आहे. तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अतीउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर येते. अशाप्रकारे माहिती बाहेर आल्याने इतर आरोपी सतर्क होतात, असं कोर्टाने नमूद केलं.  पकडलेले आरोपी सुटले तर त्यांच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं काय ? असा प्रश्न उपस्थित करत या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेHigh Courtउच्च न्यायालय