शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 5 महिन्यांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 14:51 IST

Crime News : इंजिनिअर असलेल्या तरुणाने पाच महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर वाद होत असल्याने त्याने विष घेऊन स्वत:ला संपवलं आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 5 महिन्यांत तुटलं आहे. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन तरुणाने प्रेमविवाह केला पण त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. इंजिनिअर असलेल्या तरुणाने पाच महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर वाद होत असल्याने त्याने विष घेऊन स्वत:ला संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर सौरभ शिंदे यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलीस ठाण्याचे प्रमुख सतीश द्विवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत सूचना मिळाली होती. पाच महिन्यांपूर्वी जया नावाच्या तरुणीसोबत त्याचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे ते कुटुंबापासून वेगळे राहत होते.

मैत्री, प्रेम, लग्न अन् 5 महिन्यांचा संसार

सौरभचे वडील सुभाष शिंदे यांनी आरोप केला होता की, तरुणी जया आणि सौरभ यांनी 19 जुलै 2021 रोजी प्रेम विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. सौरभ आणि जया यांनी लग्न केलं. ते दोघेही द्वारकापुरी भागात एका भाडेतत्वावर घेतलेल्या घरात राहत होते. लग्नानंतर एकदा सौरभने आपल्या वडिलांना फोन केला होता. फोनवर सौरभने त्याची प्रकृती बिघडत असल्याचं सांगितलं. मात्र सौरभच्या वडिलांना तो कुठे राहतो याबाबतही माहिती नव्हती.

लव्ह स्टोरीचा 'असा' झाला भयंकर शेवट

सौरभच्या वडिलांनी आरोप केला आहे की, सौरभच्या आत्महत्येमागे त्याची पत्नी जयावर संशय आहे. कारण जया त्याच्यावर संशय घेत होती, आणि त्याला नोकरीवर जाऊ देत नव्हती. तरुणी सौरभला मारहाणदेखील करीत असे. याशिवाय त्याला जेवणही देत नव्हती. या सर्वांमुळे सौरभने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात सतीश द्विवेदी यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक तपासानुसार सौरभने विष खाऊन आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी