इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरलेल्या उलट्या आणि जुलाबाच्या साथीने ५० वर्षीय ई-रिक्षा चालकाचा बळी घेतला आहे. या घटनेसह स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत या साथीमुळे २५ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने १५ जानेवारी रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात सादर केलेल्या अहवालात, भागीरथपुरा येथील साथीमुळे एका पाच महिन्यांच्या बालकासह केवळ सात जणांचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे.
दूषित पाण्यामुळे हेमंत गायकवाड यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांना चार मुली आहेत. हेमंत यांच्या मृत्यूनंतर पतीच्या निधनाने खचलेली पत्नी, चार मुली आणि वृद्ध माता यांना सावरणं उपस्थितांसाठी कठीण झालं होतं. हेमंत यांचे भाऊ संजय म्हणाले, "माझ्या भावाचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला आहे. अवघ्या १५ दिवसांच्या आजारपणात आम्ही त्याला गमावलं. मंगळवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला."
"गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे"
हेमंत हे ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एकमेव कमावते सदस्य होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असून राज्य सरकारने त्यांना शक्य ती सर्व मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. "माझ्या भावाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे" असं देखील संजय यांनी म्हटलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
"माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?”
हेमंत यांची मुलगी रिया म्हणाली, "बाबांना दूषित पाण्यामुळे जुलाब होण्याचा त्रास सुरू झाला होता. आम्ही त्यांना सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे त्यांचा मृत्यू झाला. माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?" भागीरथपुरा येथील रहिवाशांना गेल्या दोन वर्षांपासून दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येचे निराकरण झालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
Web Summary : Contaminated water in Indore's Bhagirathpura caused the death of a 50-year-old e-rickshaw driver, leaving behind his wife and four daughters. Locals claim 25 deaths, while the government reports seven. The family demands justice and accountability for the tragedy.
Web Summary : इंदौर के भागीरथपुरा में दूषित पानी से 50 वर्षीय ई-रिक्शा चालक की मौत हो गई, जिससे उसकी पत्नी और चार बेटियां अनाथ हो गईं। स्थानीय लोगों का दावा है कि 25 मौतें हुई हैं, जबकि सरकार ने सात बताई हैं। परिवार न्याय और जवाबदेही की मांग कर रहा है।