शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परदेशात नोकरीसाठी नेले, जंगलात ओलीस ठेवले; सुटका झाल्यानंतर सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:45 IST

शारीरिक छळानंतर काही युवकांनी त्यांच्या कुटुंबाला कॉल करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर भारतीय दूतावासाने म्यानमार सरकारकडे तक्रार पाठवली.

जयपूर - परदेशात जाऊन नोकरी करून जास्त पैसे कमावण्याचं सर्वांचेच स्वप्न असते. काहींचे ते स्वप्न पूर्ण होते तर काही जण ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. आता नोकरीची ही ऑफर तुमच्या फायद्याचीच असेल असं नाही. एखाद्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकून काहींचे आयुष्यही उद्ध्वस्त होते. अलीकडेच म्यानमारमध्ये शेकडो भारतीयांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली होती. भारत सरकारच्या प्रयत्नांनी तिथल्या स्थानिक पोलिसांनी ओलीस ठेवलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन चालवलं. त्यात पोलिसांनी एकूण ५४० भारतीय युवकांची सुटका केली ज्यात २४ वर्षीय राजस्थानी युवकाचाही समावेश होता. या युवकांपैकी काहींनी त्यांना ओलीस बनवण्याची जी घटना सांगितली ती थरकाप उडवणारी आहे.

राजस्थानातील अनेक युवक आयटी सेक्टरमध्ये काम करण्यासाठी जास्त पैशाची इच्छा ठेवतात. या युवकांना अनेक लोक परदेशात नोकरीचं आणि मोठ्या पॅकेजचं आमिष देऊन जाळ्यात ओढतात. जे युवक आयटीत करिअर बनवू इच्छितात ते लाखो रूपयांचे पॅकेज पाहून अलगद त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. गुजरातच्या एका ठगाने आमिष देऊन राजस्थानातील अनेक युवकांना शिकार बनवले. त्यातील अनेकांसोबत फसवणूक झाली, त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय या युवकांकडे काहीच पर्याय नव्हता. म्यानमारमध्ये अडकलेल्या राजस्थानी युवकाची कहाणी अशीच होती. 

या युवकाला मोठ्या पॅकेजची ऑफर देऊन आधी बँकॉकला घेऊन गेले. त्यानंतर रस्ते मार्गाने म्यानमारच्या सीमेपर्यंत आणलं. तिथून नदी पार करून म्यानमारमध्ये प्रवेश करून दिला. म्यानमारला पोहचल्यानंतर सर्व युवकांना ओलीस ठेवले आणि त्यांच्याकडून सायबर गुन्हे घडवून आणले. एका पीडित युवकाने सांगितले की, म्यानमारच्या जंगलात अनेक बड्या बड्या इमारती आहेत. त्या इमारतीत अन्य देशातून आणलेल्या युवकांना ओलीस ठेवले जाते. त्यांना सायबर फसवणूक कशी करायची हे शिकवले जाते. त्यानंतर १ कोटींची फसवणूक केल्यावर १० टक्के कमिशन आणि १० लाख रूपये दिले जायचे. जर ठराविक वेळेत सायबर गुन्ह्याचे टार्गेट पूर्ण केले नाही तर आर्थिक दंडही लावला जायचा. या युवकांचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला जायचा. ओलीस ठेवलेल्या युवकांना त्यांच्या देशातील लोकांना व्हिडिओ कॉल करायला लावायचे. जेव्हा कॉल रिसीव व्हायचा तेव्ह महिला मॉडेलशी बोलायला लावून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत पैसे लाटायचे. 

म्यानमारच्या सैनिकांनी केली सुटका

शारीरिक छळानंतर काही युवकांनी त्यांच्या कुटुंबाला कॉल करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर भारतीय दूतावासाने म्यानमार सरकारकडे तक्रार पाठवली. म्यानमार सरकारने तात्काळ दखल घेत रेस्क्यू ऑपरेशन करून अनेक इमारतीतून घुसून कारवाई केली. त्याठिकाणी भारतासह अन्य देशातील शेकडो युवकांना मुक्त केले. सुटका झालेल्या युवकांमध्ये ५४० भारतीय युवक होते. त्यातील राजस्थानातील ३१ युवक होते त्यांना २ दिवसांपूर्वीच राजस्थानात आणले गेले. भारतात आणलेल्या या युवकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून भविष्यात ते सायबर गुन्ह्यात लोकांची फसवणूक करू नये अशी सूचना कुटुंबाला दिली आहे.

दरम्यान, दर महिन्याला ८७ लाखांची फसवणूक करण्याचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर ७५ हजार महिना पगार युवकांना दिला जायचा. त्यात आणखी ७ लाख रूपये इसेंटिव्ह म्हणून आमिष दिले जायचे. जर युवकांनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले नाही तर त्यांना जेवण द्यायचे नाहीत. मारहाण व्हायची, काहींना इलेक्ट्रिक शॉकही दिले आहेत असं राजस्थानच्या जयपूर पोलिसांनी सांगितले. म्यानमारच्या जंगलात उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारतींमध्ये युवकांना कैद ठेवले जायचे. त्याला आयटी पार्क असं नाव दिले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम