शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

आंतरराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, बेकायदा ‘कॉल राउंटिंग’चे पाेलिसांनी उधळले रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:35 IST

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे.

नवी मुंबई : वेगवेगळ्या देशांतून भारतात येणाऱ्या कॉलचे बेकायदेशीर राउंटिंग करणाऱ्या कॉल सेंटरचा काळा धंदा गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केला. दूरसंचार विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडवून हे कॉल सेंटर चालवले जात होते. त्याची माहिती मिळताच दोन महिन्यांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करून चौघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातील नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून वापरले जाणारे सर्व्हर नवी मुंबई परिसरात असल्याने डॉटने याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेला कळवले होते. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे व कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तयार केले होते.

त्यांच्याकडून चाललेल्या सुमारे दोन महिन्यांच्या तपासानंतर चौघांना अटक करून त्यांच्यामार्फत चालणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उघडकीस आणले आहे.सूरज वर्मा, अनुप वर्मा, साजिद सय्यद व अब्दुल फिरोजाबादी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार व मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

शासनाचे तीन कोटी बुडविलेकाही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे. परंतु हे रॅकेट उघड होऊ शकले नव्हते. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हेगारांचा शोध घेऊन हे रॅकेट उघड केले आहे. त्यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भामट्यांनी काही महिन्यांत शासनाचा तीन कोटींहून अधिक महसूल बुडवला आहे.

अशी हाेती मोडस ऑपरेंडीदूरसंचार विभागाच्या नियमावलीनुसार वेगवेगळ्या देशातून नेटवर्क कंपन्यांमार्फत भारतात थेट कॉल येत असतात. त्याची नोंद होत असते. शिवाय त्यामार्फत शासनालादेखील महसूल मिळत असतो. परंतु, अटक केलेल्या चौघांनी त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ग्लोबल इंटरप्रायजेस नावाची कंपनी सुरू केली होती. तिच्या माध्यमातून त्यांनी विदेशातल्या काही कंपन्यांसोबत व्यवहार ठरवून भारतात येणारे कॉल थेट न जाऊ देता त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाठवले जात होते. यासाठी ग्लोबल इंटरप्रायजेसने एका नेटवर्क कंपनीचे सुमारे बाराशे नंबर घेतले होते.त्याद्वारे विदेशातून भारतीयांना येणारे कॉल इंटरनेटच्या माध्यमातून बाराशेपैकी कोणत्याही नंबरवरून पुढे पाठवला जायचा. त्यामुळे भारतीयांना त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल येऊनदेखील नंबर मात्र भारतातीलच दिसत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी