शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आंतरराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, बेकायदा ‘कॉल राउंटिंग’चे पाेलिसांनी उधळले रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:35 IST

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे.

नवी मुंबई : वेगवेगळ्या देशांतून भारतात येणाऱ्या कॉलचे बेकायदेशीर राउंटिंग करणाऱ्या कॉल सेंटरचा काळा धंदा गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केला. दूरसंचार विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडवून हे कॉल सेंटर चालवले जात होते. त्याची माहिती मिळताच दोन महिन्यांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करून चौघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातील नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून वापरले जाणारे सर्व्हर नवी मुंबई परिसरात असल्याने डॉटने याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेला कळवले होते. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे व कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तयार केले होते.

त्यांच्याकडून चाललेल्या सुमारे दोन महिन्यांच्या तपासानंतर चौघांना अटक करून त्यांच्यामार्फत चालणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उघडकीस आणले आहे.सूरज वर्मा, अनुप वर्मा, साजिद सय्यद व अब्दुल फिरोजाबादी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार व मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

शासनाचे तीन कोटी बुडविलेकाही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे. परंतु हे रॅकेट उघड होऊ शकले नव्हते. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हेगारांचा शोध घेऊन हे रॅकेट उघड केले आहे. त्यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भामट्यांनी काही महिन्यांत शासनाचा तीन कोटींहून अधिक महसूल बुडवला आहे.

अशी हाेती मोडस ऑपरेंडीदूरसंचार विभागाच्या नियमावलीनुसार वेगवेगळ्या देशातून नेटवर्क कंपन्यांमार्फत भारतात थेट कॉल येत असतात. त्याची नोंद होत असते. शिवाय त्यामार्फत शासनालादेखील महसूल मिळत असतो. परंतु, अटक केलेल्या चौघांनी त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ग्लोबल इंटरप्रायजेस नावाची कंपनी सुरू केली होती. तिच्या माध्यमातून त्यांनी विदेशातल्या काही कंपन्यांसोबत व्यवहार ठरवून भारतात येणारे कॉल थेट न जाऊ देता त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाठवले जात होते. यासाठी ग्लोबल इंटरप्रायजेसने एका नेटवर्क कंपनीचे सुमारे बाराशे नंबर घेतले होते.त्याद्वारे विदेशातून भारतीयांना येणारे कॉल इंटरनेटच्या माध्यमातून बाराशेपैकी कोणत्याही नंबरवरून पुढे पाठवला जायचा. त्यामुळे भारतीयांना त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल येऊनदेखील नंबर मात्र भारतातीलच दिसत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी