शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, बेकायदा ‘कॉल राउंटिंग’चे पाेलिसांनी उधळले रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:35 IST

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे.

नवी मुंबई : वेगवेगळ्या देशांतून भारतात येणाऱ्या कॉलचे बेकायदेशीर राउंटिंग करणाऱ्या कॉल सेंटरचा काळा धंदा गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केला. दूरसंचार विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडवून हे कॉल सेंटर चालवले जात होते. त्याची माहिती मिळताच दोन महिन्यांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करून चौघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातील नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून वापरले जाणारे सर्व्हर नवी मुंबई परिसरात असल्याने डॉटने याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेला कळवले होते. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे व कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तयार केले होते.

त्यांच्याकडून चाललेल्या सुमारे दोन महिन्यांच्या तपासानंतर चौघांना अटक करून त्यांच्यामार्फत चालणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उघडकीस आणले आहे.सूरज वर्मा, अनुप वर्मा, साजिद सय्यद व अब्दुल फिरोजाबादी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार व मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

शासनाचे तीन कोटी बुडविलेकाही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे. परंतु हे रॅकेट उघड होऊ शकले नव्हते. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हेगारांचा शोध घेऊन हे रॅकेट उघड केले आहे. त्यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भामट्यांनी काही महिन्यांत शासनाचा तीन कोटींहून अधिक महसूल बुडवला आहे.

अशी हाेती मोडस ऑपरेंडीदूरसंचार विभागाच्या नियमावलीनुसार वेगवेगळ्या देशातून नेटवर्क कंपन्यांमार्फत भारतात थेट कॉल येत असतात. त्याची नोंद होत असते. शिवाय त्यामार्फत शासनालादेखील महसूल मिळत असतो. परंतु, अटक केलेल्या चौघांनी त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ग्लोबल इंटरप्रायजेस नावाची कंपनी सुरू केली होती. तिच्या माध्यमातून त्यांनी विदेशातल्या काही कंपन्यांसोबत व्यवहार ठरवून भारतात येणारे कॉल थेट न जाऊ देता त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाठवले जात होते. यासाठी ग्लोबल इंटरप्रायजेसने एका नेटवर्क कंपनीचे सुमारे बाराशे नंबर घेतले होते.त्याद्वारे विदेशातून भारतीयांना येणारे कॉल इंटरनेटच्या माध्यमातून बाराशेपैकी कोणत्याही नंबरवरून पुढे पाठवला जायचा. त्यामुळे भारतीयांना त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल येऊनदेखील नंबर मात्र भारतातीलच दिसत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी