शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीत वाढले अमली पदार्थांचे व्यसन, पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:56 IST

टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत.

नवी मुंबई -  कोरोनामुळे लागू केलेल्याटाळेबंदीच्या काळात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे युवकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांना केले आहे.टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत. याचा नेमका फायदा अमली पदार्थ विक्रेत्यांनी घेतला आहे. चिंता व नैराश्य घालविण्यासाठी तरुण विविध पर्यायांचा शोध घेताना दिसत आहे. ही बाब अमली पदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. सैरभैर झालेल्या तरुणवर्गाला विविध मार्गाने आकर्षित करून त्यांना अमली पदार्थांची सवय लावली जात आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळात अमली पदार्थांची विक्री व सेवन यात वाढ झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.टाळेबंदीच्या काळात पान, बिडी, सिगारेट, तसेच मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टींचे व्यसन असणाऱ्यांची पंचाईत झाली होती. टाळेबंदीतही तबांखूजन्य पदार्थ, दारूची तिप्पट दराने विक्री होत होती. त्यामुळे अनेकांनी या व्यसनाला फाटा दिला, परंतु त्याच वेळी तंबाखूजन्य पदार्थापेक्षा कमी दरात अमली पदार्थ उपलब्ध करून देण्याची शक्कल काही ड्रग्ज माफियांनी लढविली. महागड्या तंबाखूजन्य पदार्थापासून दूर गेलेल्या युवकांना एमडी, गांजा आदी अमली पदार्थ स्वस्त व सहज उपलब्ध करून देण्यात ड्रग्ज माफिया यशस्वी झाले.अमली पदार्थांमुळे भूक वाढते, एकाग्रता वाढते, अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे, तसेच कोणीही अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी युवकांना केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड