शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

टाळेबंदीत वाढले अमली पदार्थांचे व्यसन, पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:56 IST

टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत.

नवी मुंबई -  कोरोनामुळे लागू केलेल्याटाळेबंदीच्या काळात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे युवकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांना केले आहे.टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत. याचा नेमका फायदा अमली पदार्थ विक्रेत्यांनी घेतला आहे. चिंता व नैराश्य घालविण्यासाठी तरुण विविध पर्यायांचा शोध घेताना दिसत आहे. ही बाब अमली पदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. सैरभैर झालेल्या तरुणवर्गाला विविध मार्गाने आकर्षित करून त्यांना अमली पदार्थांची सवय लावली जात आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळात अमली पदार्थांची विक्री व सेवन यात वाढ झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.टाळेबंदीच्या काळात पान, बिडी, सिगारेट, तसेच मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टींचे व्यसन असणाऱ्यांची पंचाईत झाली होती. टाळेबंदीतही तबांखूजन्य पदार्थ, दारूची तिप्पट दराने विक्री होत होती. त्यामुळे अनेकांनी या व्यसनाला फाटा दिला, परंतु त्याच वेळी तंबाखूजन्य पदार्थापेक्षा कमी दरात अमली पदार्थ उपलब्ध करून देण्याची शक्कल काही ड्रग्ज माफियांनी लढविली. महागड्या तंबाखूजन्य पदार्थापासून दूर गेलेल्या युवकांना एमडी, गांजा आदी अमली पदार्थ स्वस्त व सहज उपलब्ध करून देण्यात ड्रग्ज माफिया यशस्वी झाले.अमली पदार्थांमुळे भूक वाढते, एकाग्रता वाढते, अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे, तसेच कोणीही अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी युवकांना केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड