शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:52 IST

पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला खुशी तिवारी हिने तिचे खरे नाव साहिबा बानो असल्याचं सांगितले. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिची ओळख देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या कौशल गौंडसोबत झाली होती.

कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी सुकरौली येथील मझना नाल्यात ६ जून रोजी जबलपूरच्या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला होता. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी खुलासा केला. या हत्या प्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यांना पुराव्यासह कोर्टात हजर करून पोलीस कोठडीत पाठवले आहे. बनावट लग्न करून युवकाची संपत्ती हडप करण्याचा हा प्लॅन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत एसपी संतोष कुमार मिश्रा म्हणाले की, सुकरौली येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख आणि संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची ३ पथके बनवली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी विविध अँगलने चौकशी केली गेली. त्यानंतर हा मृतदेह मध्य प्रदेशातील जबलपूर येथील युवक इंद्रकुमार तिवारी याचा असल्याचे समोर आले. मृतदेहाची ओळख त्याच्या कुटुंबाने पटवली. हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रारही स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून युवकाचे आधार कार्ड, लग्नात वापरलेले दागिने, रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. 

पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला खुशी तिवारी हिने तिचे खरे नाव साहिबा बानो असल्याचं सांगितले. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिची ओळख देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या कौशल गौंडसोबत झाली होती. सुरुवातीला या दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. गोरखपूर येथे भाड्याने खोली घेऊन ते राहत होते. त्यातच एकेदिवशी दोघांनी सोशल मीडियावर इंद्रकुमार तिवारी याचा व्हायरल व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओत तो १८ एकर जमीन असूनही माझे लग्न होत नसल्याचे सांगितले. ही कहाणी ऐकून साहिबा आणि कौशलने एक प्लॅन बनवला. त्यानुसार इंद्रकुमारसोबत बनावट लग्न करून त्याची संपत्ती हडप करण्याचा डाव दोघांनी आखला. 

इंद्रकुमारला भेटायला कौशल जबलपूरला गेला

प्लॅनिंगनुसार, कौशल इंद्रकुमारला भेटायला मध्य प्रदेशातील जबलपूर येथे गेला. तिने त्याने साहिबा बानो हिची ओळख खुशी तिवारी म्हणून केली. साहिबाला स्वत:ची बहीण सांगून त्याने इंद्रकुमारसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर काही दिवस साहिबा बानो खुशी तिवारी म्हणून इंद्रकुमारशी फोनवर बोलू लागली. त्यानंतर लग्नासाठी त्याला गोरखपूरला बोलावले. ३ जून रोजी इंद्रकुमार गोरखपूरला आला. तिथे प्लॅनिंगनुसार साहिबा बानो आणि कौशल कुमार याने इंद्रकुमारच्या संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्र बनवले. त्यानंतर कौशल आणि समसुद्दीन यांच्या मदतीने साहिबाने इंद्रकुमारची हत्या करण्याचे ठरवले. ५ जून रोजी लग्नाचे खोटे नाटक करून साहिबा बानो आणि इंद्रकुमारचे लग्न लावले. 

मधुचंद्राची ती रात्र....

लग्नानंतर इंद्रकुमार तिवारीला पनीर राईसमध्ये झोपेच्या गोळ्या घालून खायला दिले. त्यानंतर काही वेळाने इंद्रकुमार बेशुद्ध झाला. या तिघांनी इंद्रकुमारला कारमध्ये बसवून सुकरौलीला नेले. तिथे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इंद्रकुमारची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह झुडपात टाकून दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी