शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 17:23 IST

या वादात राजकुमारनं हेमलताला गोळी मारून तिची हत्या केली. या हत्येचं प्लॅनिंग राजकुमारनं आधीच केले होते.

नवी दिल्ली - "साहेब, माझ्या बायकोला गुंडांनी गोळी मारली, मी बायकोला माहेरहून माझ्या घरी घेऊन चाललो होतो. तेव्हा ६ हल्लेखोरांनी आम्हाला घेरलं. त्यांनी आम्हाला मारहाण करत लुटलं, त्यानंतर गोळी मारली..." १४ मे २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील बरेली इथं राजकुमार नावाचा व्यक्ती ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पोहचला तेव्हा पोलीसही हैराण झाले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात राजकुमारची पत्नी हेमलताचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तातडीनं या घटनेचा तपास सुरू केला.

या घटनेची चौकशी करताना पोलिसांना घटनास्थळी काही असे निदर्शनास आले ज्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. जर हल्लेखोर ६ जण असतील तर राजकुमार सुरक्षित कसा राहिला?, जर ते लुटायला आले होते मग राजकुमारचा मोबाईल त्याच्याकडे का सोडला?, जर गुंडांनी लूटपाट केली असेल तर महिलेच्या हातातील बांगड्या तुटल्या कशा नाहीत? कारण महिलेसोबत कुणी जबरदस्ती करत असेल तर ती रोखण्यासाठी हाताचा वापर करते, तेव्हा हातातील बांगड्या तुटतात. 

जवळपास ९ दिवस पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधत होती त्यानंतर जे उत्तर मिळालं त्यातून हेमलताची हत्या करणारा गुन्हेगार जाळ्यात अडकला. पोलिसांच्या माहितीनुसार, राजकुमार आणि हेमलता यांचं लग्न काही वर्षापूर्वी झाले होते. सुरुवातीला सर्व ठीक होते, परंतु अलीकडे राजकुमारला हेमलतावर संशय होता. हेमलता रिल बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायची. ही गोष्ट राजकुमारला समजली तेव्हा त्याने हेमलताला मारहाण करत तिचा फोन तोडला. हेमलता या घटनेमुळे नाराज होत माहेरी निघून गेली. 

काही दिवसांनी हेमलता गर्भवती असल्याचं राजकुमारला कळालं. त्यामुळे त्याचा संशय आणखी वाढला. त्यामुळे त्याच्या डोक्यात भयानक कट शिजला. १४ मे रोजी राजकुमार हेमलताला घ्यायला तिच्या माहेरी गेला. तिथे हेमलतावर त्याचे खूप प्रेम आहे असं भासवलं. त्यानंतर दुचाकीवर बसवून तिला घेऊन गेला, बाजारात तिला नवीन बांगड्या घेतल्या. दुपारी तो तिला घेऊन घरी जात होता. तेव्हा रस्त्यात निर्जन स्थळी राजकुमारला दुचाकी रोखली. त्यानंतर तुझ्या पोटात कुणाचं बाळ असा सवाल त्याने हेमलताला केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. 

या वादात राजकुमारनं हेमलताला गोळी मारून तिची हत्या केली. या हत्येचं प्लॅनिंग राजकुमारनं आधीच केले होते. त्याने १ दिवस आधी बंदूक आणि २ कारतूस खरेदी केली होती. त्यानंतर मित्र राम बहादुरला कटात सहभागी केले. हत्येनंतर राम बहादुरला फोन केला. त्याचा मित्र घटनास्थळी आला. राम बहादुरनं आधी राजकुमारची दुचाकी खाली पाडली. त्यानंतर हेमलताच्या शरीरावरील दागिने घेऊन तिथून पळून गेला. 

दरम्यान, प्लॅनिंगनुसार राम बहादुरने बंदूक लपवली. त्यानंतर राजकुमारनं त्याचे बूट शेतात फेकून दिले. घटनास्थळावरील सर्व पुरावे नष्ट करून राम बहादूर गावात पोहचला आणि राजकुमारला दरोडेखोरानी लुटलं असं गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर गावकरी धावत घटनास्थळी गेले, तिथे राजकुमारनं बेशुद्धीचं नाटक केले. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. परंतु डॉक्टरांना त्यांच्या शरीरावर कुठेही मारहाणीच्या खूणा दिसल्या नाहीत. त्यानंतर राजकुमारनं पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आणि बनावट कहाणी सांगितली. परंतु ही सर्व पोलखोल पोलिसांसमोर उघड पडली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी