शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा आला राग, ३ मुलांनीच रचला कट; तिहेरी हत्येने खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:39 IST

एका विधवेसोबत वडिलांनी दुसरं लग्न केल्याच्या रागातून पोटच्या ३ पोरांनी वडिलांसह सावत्र आई आणि ५ वर्षीय सावत्र बहिणीला कायमचं संपवलं

प्रतापगड - राजस्थानच्या प्रतापगड येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी तिहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ माजली आहे. प्रतापगडच्या ३ कलियुगी मुलांनी कट रचला आणि वडील, सावत्र आईसह ५ वर्षीय बहिणीची हत्या केली. या तिन्ही मृतदेहांना दगड बांधून ते बंधाऱ्यात फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी २ मुलांना अटक केली असून तिसरा मुलगा परदेशात पळून गेल्याची माहिती आहे. 

प्रतापगड जिल्ह्यातील मुंगाना टांडा गावात ही घटना समोर आली आहे. तिहेरी हत्याकांडात मृतकाची २ मुले मनीराम, करणीराम यांना अटक केली. या आरोपींनी पोलीस तपासात गु्न्हा कबूल केला असून त्यांनी सांगितलेल्या माहितीनं पोलिसही हैराण झाले आहेत. आरोपींनी चौकशीत सांगितले की, आमच्या वडिलांनी एका विधवेसोबत ४ वर्षापूर्वी दुसरं लग्न केले होते. त्यामुळे आम्ही तिघं भाऊ नाराज होतो. त्यामुळेच आम्ही वडील सूरजमल लबाना, त्यांची पत्नी लच्छी देवी आणि ५ वर्षीय मुलीची हत्या केली असं त्यांनी पोलिसांना सांगितले.

५० किलोचा दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकला

हत्या केल्यानंतर आरोपींनी वडील, सावत्र आई, बहीण यांचा मृतदेह ५०-५० किलोचा दगड बांधून जवळच्या एका बंधाऱ्यात फेकून दिला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये यासाठी आरोपींनी त्यांना दगड बांधले. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पोलिसांनी हे सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढले. 

गावकऱ्यांनी केला पोलिसांना फोन

आरोपींनी मोठ्या शिताफीनं वडील, सावत्र आई आणि सावत्र बहिणीचा खून केला त्यानंतर त्यांचा मृतदेह फेकून दिला. मात्र गावात हे कुटुंब दिसायचे बंद झाले तेव्हा या गोष्टीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा घराच्या आत रक्ताचे डाग सापडले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर आरोपी २ मुलांना अटक केली. त्यांच्या तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी