शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

पत्नीचा हत्या करून पतीनं घेतला गळफास; आई वडिलांच्या मृत्यूनं मुलांना बसला धक्का

By नामदेव भोर | Updated: February 23, 2023 05:21 IST

चुंचाळे घरकुल योजनेतील घटनेने खळबळ, या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई-वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला.

नाशिक - अंबड चुंचाळे घरकुल योजनेतील एका घरात पत्नीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सातपूरच्या शिवाजीनगर भागात मंगळवारी पत्नीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अशीच घटना समोर आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे घरकुल येथील इमारत क्रमांक १९ मध्ये दुसऱ्या मजल्यावर भुजंग तायडे (वय ३५) हा कुटुंबासमवेत राहत असून, त्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्नी मनीषा तायडे (३०) हिच्या मानेवर चाकूने वार करीत गळा चिरून ठार केले. यानंतर स्वतः भुजंग याने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई-वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु, आतून कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता घरातील पलंगावर मनीषा तायडे मृतावस्थेत पडलेली होती. भुजंग तायडे याने स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत कामगार होता . त्याला दोन मुले असून, या घटनेने दोन्ही मुलांचे छत्र हरविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पती-पत्नीचे मोबाइल पोलिसांच्या ताब्यात

चुंचाळे भागात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब घरात शिरूर पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी पती भुजंग व पत्नी मनीषा या दोघांचेही मोबाइल ताब्यात घेतले असून, या मोबाइलच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळावर भेट देऊन पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.

चारित्र्याच्या संशयातून घटना

मृत भुजंग तायडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो नाशिकमध्ये येऊन येथेच स्थायिक झाला होता. परंतु, मागील काही दिवसांपासून पती भुजंग तायडे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. त्याच वादातून भुजंग याने मनीषाचा गळा चिरून स्वत:ला संपविल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चुंचाळेतील घरकुल योजनेत पत्नीचा खून पतीने केल्याची घटना समोर आली असून, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी दोघांचेही मोबाइल फोन ताब्यात घेतले असून, अधिकचा तपास सुरू आहे - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त परिमंडळ २ नाशिक

टॅग्स :Policeपोलिस