शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पत्नीचा हत्या करून पतीनं घेतला गळफास; आई वडिलांच्या मृत्यूनं मुलांना बसला धक्का

By नामदेव भोर | Updated: February 23, 2023 05:21 IST

चुंचाळे घरकुल योजनेतील घटनेने खळबळ, या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई-वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला.

नाशिक - अंबड चुंचाळे घरकुल योजनेतील एका घरात पत्नीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सातपूरच्या शिवाजीनगर भागात मंगळवारी पत्नीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अशीच घटना समोर आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे घरकुल येथील इमारत क्रमांक १९ मध्ये दुसऱ्या मजल्यावर भुजंग तायडे (वय ३५) हा कुटुंबासमवेत राहत असून, त्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्नी मनीषा तायडे (३०) हिच्या मानेवर चाकूने वार करीत गळा चिरून ठार केले. यानंतर स्वतः भुजंग याने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई-वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु, आतून कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता घरातील पलंगावर मनीषा तायडे मृतावस्थेत पडलेली होती. भुजंग तायडे याने स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत कामगार होता . त्याला दोन मुले असून, या घटनेने दोन्ही मुलांचे छत्र हरविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पती-पत्नीचे मोबाइल पोलिसांच्या ताब्यात

चुंचाळे भागात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब घरात शिरूर पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी पती भुजंग व पत्नी मनीषा या दोघांचेही मोबाइल ताब्यात घेतले असून, या मोबाइलच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळावर भेट देऊन पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.

चारित्र्याच्या संशयातून घटना

मृत भुजंग तायडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो नाशिकमध्ये येऊन येथेच स्थायिक झाला होता. परंतु, मागील काही दिवसांपासून पती भुजंग तायडे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. त्याच वादातून भुजंग याने मनीषाचा गळा चिरून स्वत:ला संपविल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चुंचाळेतील घरकुल योजनेत पत्नीचा खून पतीने केल्याची घटना समोर आली असून, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी दोघांचेही मोबाइल फोन ताब्यात घेतले असून, अधिकचा तपास सुरू आहे - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त परिमंडळ २ नाशिक

टॅग्स :Policeपोलिस