शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

चालत्या ट्रेनमध्ये भरदिवसा हत्या; युवकाच्या डोक्यात गोळी झाडून आरोपी पळून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:15 IST

गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

लखीसराय - बिहारमध्ये चालत्या ट्रेनमध्ये एकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लखीसराय येथे एका युवकाची गया हावडा एक्सप्रेसमध्ये गोळी मारून हत्या केली. ही घटना किऊल रेल्वे स्टेशनजवळ घडली. मृत युवकाचं नाव धर्मेंद्र साह असं आहे. जो लखीसरायच्या महिसोना गावातील रहिवासी होता. ३-४ आरोपींनी ट्रेनमध्ये चढून धर्मेंद्रला गोळी झाडली त्यानंतर चेन खेचून पळून गेले. सुरुवातीच्या पोलीस तपासात जमीन वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गया हावडा एक्सप्रेस किऊल रेल्वे स्टेशनवरून पुढे निघाली तेव्हा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या धर्मेंद्र साहवर अचानक गोळीबारी झाली. ३-४ गुन्हेगार आधीच ट्रेनमध्ये दबा धरून बसले होते. या लोकांनी ठरवून धर्मेंद्रवर गोळीबार केला. गोळी लागल्याने धर्मेंद्रचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवासी घाबरले. ट्रेनमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गुन्हेगारांनी धर्मेंद्रवर गोळीबार करत ट्रेनमधील साखळी ओढली. त्यानंतर ट्रेन थांबताच ते आरोपी फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृत धर्मेंद्र साह याची ओळख पटवली. धर्मेंद्र हे लखीसरायच्या महिसोना गावचा रहिवासी होता. त्याच्याकडे सापडलेल्या ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांवरून हे उघडकीस आले. पोलिसांनी सांगितले की, मृतकाजवळ सापडलेली कागदपत्रे जमिनीच्या वादाशी संबंधित आहेत. सुरुवातीच्या तपासानुसार, जमिनीच्या वादातून धर्मेंद्रची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंचा पोलीस तपास करत आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली.

दरम्यान, गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. किऊल-भागलपूर रेल्वे मार्गावरील  सिग्नलजवळ ही घटना घडली. ट्रेन किऊल स्टेशनवरून निघताच पुढील सिग्नलजवळ गुन्हेगारांनी तरुणाच्या डोक्यात गोळी झाडली आणि साखली ओढून चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला 

टॅग्स :Firingगोळीबारrailwayरेल्वेBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी