शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भिवंडीत तीन सराईत चोरट्यांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

By नितीन पंडित | Updated: February 22, 2024 18:52 IST

भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

भिवंडी: शहरात वाहन चोरीच्या घटना वाढलेल्या असताना शांतीनगर पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून चार रिक्षा,सहा दुचाकी व एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.       शहरातील वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिल्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलिस हवालदार संतोष मोरे, रिजवान सैय्यद, पोलिस नाईक श्रीकांत धायगुडे, किरण मोहिते, पोलिस शिपाई दिपक सानप, रूपेश जाधव, मनोज मुके, प्रशांत बर्वे यांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक मालेगाव येथील संशयित इसम मोहम्मद अरफाद मोहम्मद आरीफ अन्सारी,वय २१,रा. मालेगांव, जि. नाशिक हा भिवंडी परिसरात येऊन रिक्षा चोरी करीत असल्याचे समजले. त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत त्यांचेकडे कसून तपास केला असता त्याने भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेला आरोपी मकसुद दस्तगीर अंसारी,वय २२,रा.न्यु आझाद नगर, भिवंडी यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे केलेल्या तपासात त्याने शांतीनगर,निजामपूर,भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली एकूण चार पाच दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे. तिसऱ्या घटनेत सराईत गुन्हेगार जुनैद उर्फ गुलाब अहमद मोहम्मद हनीफ शहा, वय २०, रा.गायत्रीनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी