शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

इगतपुरी जळीतकांड : ‘त्या’ कारमधील जळालेला मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा, घातपात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 06:12 IST

Crime News: जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून, सदर मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेवाडी शिवारात मंगळवारी (दि. ३०) जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून, सदर मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आता त्यानुसार पुढील तपासाची चक्रे फिरविली आहेत.

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात एक कार जळाल्याची माहिती मंगळवारी (दि. ३०) प्राप्त होताच त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास केला असता, सदर घटना २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा कयास लावण्यात आला होता. या जळालेल्या कारमध्ये एक अज्ञात व्यक्तीही जळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सदर गाडी व संबंधित मृत कोण याबाबत तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. या जळीतकांडात जळालेली व्यक्ती पुरुष असल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाल्यानंतर घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली. संबंधित व्यक्ती चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ (३६) ही असल्याचे निष्पन्न झाले.

दोन महिन्यांपूर्वीच लष्करी सेवा संपवून, संदीप गुंजाळ हे निवृत्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. निवृत्तीनंतर त्यांनी इगतपुरी तालुक्यातील एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी सुरू केली होती, असेही सांगितले जात आहे. चांदवडवरून ते इगतपुरी येथे ये-जा करत असत. सदर कंपनी व जळीतकांड घडलेले ठिकाण १२ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने, त्याच परिसरात असल्याने गुंजाळ यांचा घातपात झाला असल्याचा कयास पोलीस सूत्रांच्या वतीने वर्तविला जात आहे. सदर घटनेचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. या जळीतप्रकरणी विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, तपास अधिकारी संजय कवडे आदी तपास करीत आहेत.

पोलिसांपुढे आव्हान

पर्यटन क्षेत्र असलेल्या या आंबेवाडी परिसरात झालेल्या जळीतकांडातील मयत संदीप गुंजाळ हे एकटे होते की त्यांच्या समवेत आणखी कोण होते. ते ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या कंपनीतील कुणाचा यामध्ये सहभाग आहे काय, झालेला हा अपघात आहे की घातपात आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून पोलिसांसमोर याचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक