शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

“मला ८ लाखात विकलंय, या संकटातून बाहेर काढा”; अल्पवयीन युवतीचं मंत्र्यांना पत्र, प्रशासनात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 11:31 IST

मी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. माझे वडील जे दारु पितात आणि जुगार खेळतात ते बळजबरीनं माझं लग्न लावत आहेत असं या पत्रात म्हटलं आहे.

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं राज्याच्या एका मंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. मला वाचवा, मला ८ लाखात विकलं आहे. जर तुम्ही वाचवलं नाही तर एका मुलीच्या हत्येचं पाप तुमच्या माथी लागेल. मी त्या मुलाशी लग्न करणार नाही, आत्महत्या करेन अशा भावना अल्पवयीन मुलीनं राज्य सरकारमधील एका मंत्र्याला पत्र लिहून कळवल्या आहेत.

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील सैपऊ येथील गावातील ही घटन आहे. याठिकाणी १५ वर्षीय मुलीनं राजस्थान सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांच्या नावानं पत्र लिहिलं आहे. त्यात युवतीने बळजबरीनं होणारं तिचं लग्न थांबवण्यासाठी मंत्र्यांकडे याचना केली आहे. इतकचं नाही तर जर माझ्या मर्जीविरोधात जर माझं लग्न लावलं तर मी आत्महत्या करेन असंही या युवतीने पत्रात लिहिलं आहे.

मंत्र्यांनी घेतली पत्राची तात्काळ दाखल

मंत्री ममता भूपेश यांच्या नावाने युवतीने हे पत्र ईमेलच्या माध्यमातून महिला आणि बालविकास विभागाच्या धैलापूर कार्यालयात पाठवलं आहे. या पत्रानंतर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी भूपेश गर्ग यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत जिल्हाधिकारी राकेश कुमार जयस्वाल यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सैंपऊ उपखंडच्या सीडीपीओला या प्रकरणाचा तपास करुन लग्न थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनाही संबंधित प्रकरणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पत्रात काय म्हटलंय?

महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. माझे वडील जे दारु पितात आणि जुगार खेळतात ते बळजबरीनं माझं लग्न लावत आहेत. माझं लग्न १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुसऱ्या ठिकाणावर होणार आहे. माझ्या वडिलांनी नवऱ्याच्या कडच्या मंडळींकडून ८ लाख रुपये घेतले आहे म्हणजे मला विकले आहे. याची तक्रार मी स्थानिक पोलीस ठाण्यात केली. परंतु त्यांनी माझ्या वडिलांची साथ दिली.

तसेच तुम्ही माझ्यासाठी आईप्रमाणे आहात. मला या संकटातून वाचवा. हात जोडून तुम्हाला विनंती करतेय. जर तुम्ही मला मदत केली नाही तर एका मुलीच्या हत्येचं पाप तुमच्या माथी लागेल. कारण मी त्या मुलासोबत लग्न करणार नाही. त्याऐवजी मी आत्महत्या करेन. अल्पवयीन युवतीने लिहिलेल्या पत्रामुळे महिला आणि बालविकास विभागात खळबळ माजली. मंत्र्यांनी तात्काळ या पत्राची दखल घेत प्रशासनाला कामाला लावले.

टॅग्स :Rajasthanराजस्थान