शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:27 IST

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. लग्न हे असं बंधन आहे, जे आयुष्यभरासाठी निभावावं लागतं. परंतु, हाच एक निर्णय जर चुकला तर आयुष्याची माती होते, असे म्हणतात. लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो आणि प्रत्येकाला आपला जोडीदार परिपूर्ण असावा असे वाटते. अनेकदा लग्नानंतरही नाती तुटतात, त्यामुळे लोक आपला जोडीदार निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींची चौकशी करतात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. मात्र, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका नवरदेवाने लग्नापूर्वीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून नवरदेवाने गळफास लावून आपले जीवन संपवले. मृत्यूपूर्वी, तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की, "मला त्यांची मुलगी आवडत नाही, तरीही हे लोक लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे त्रस्त होऊन मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला कटरा समानमधून आलेले ८-१० लोक जबाबदार आहेत, जे मला त्रास देत आहेत आणि पैशाची धमकी देत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही लग्न करूनच जाऊ. या लोकांमुळेच मी माझा जीव देत आहे."

ही घटना आग्रा येथील दन्नाहार पोलीस स्टेशन परिसरातील महटौली गावातील आहे. येथे विक्रम राठौरच्या लग्नाची बोलणी कटरा समान येथे राहणाऱ्या एका मुलीशी सुरू होती. विक्रमने मुलीची उंची कमी असल्यामुळे लग्नास नकार दिला होता, परंतु मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होते.

मुलीकडील लोक लग्नासाठी टाकत होते दबाव!

बुधवारीही कटरा समानमधील लोक शेजारील गाव डांडेहारच्या काही लोकांसह विक्रमच्या घरी महटौली येथे आले. सर्वजण त्याच्यावर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकू लागले. यामुळे त्रस्त होऊन विक्रम शेतात गेला. तेथे त्याने आपल्या मोबाईलवर एक सुसाइड नोट लिहिली आणि ती फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर १० मिनिटांनी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

वडिलांनी दुसरीकडे ठरवले होते लग्न

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचे लग्न दुसरीकडे ठरवले होते आणि कटरा समानचे लोक जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होते. याच त्रासातून त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश