शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:27 IST

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. लग्न हे असं बंधन आहे, जे आयुष्यभरासाठी निभावावं लागतं. परंतु, हाच एक निर्णय जर चुकला तर आयुष्याची माती होते, असे म्हणतात. लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो आणि प्रत्येकाला आपला जोडीदार परिपूर्ण असावा असे वाटते. अनेकदा लग्नानंतरही नाती तुटतात, त्यामुळे लोक आपला जोडीदार निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींची चौकशी करतात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. मात्र, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका नवरदेवाने लग्नापूर्वीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून नवरदेवाने गळफास लावून आपले जीवन संपवले. मृत्यूपूर्वी, तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की, "मला त्यांची मुलगी आवडत नाही, तरीही हे लोक लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे त्रस्त होऊन मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला कटरा समानमधून आलेले ८-१० लोक जबाबदार आहेत, जे मला त्रास देत आहेत आणि पैशाची धमकी देत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही लग्न करूनच जाऊ. या लोकांमुळेच मी माझा जीव देत आहे."

ही घटना आग्रा येथील दन्नाहार पोलीस स्टेशन परिसरातील महटौली गावातील आहे. येथे विक्रम राठौरच्या लग्नाची बोलणी कटरा समान येथे राहणाऱ्या एका मुलीशी सुरू होती. विक्रमने मुलीची उंची कमी असल्यामुळे लग्नास नकार दिला होता, परंतु मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होते.

मुलीकडील लोक लग्नासाठी टाकत होते दबाव!

बुधवारीही कटरा समानमधील लोक शेजारील गाव डांडेहारच्या काही लोकांसह विक्रमच्या घरी महटौली येथे आले. सर्वजण त्याच्यावर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकू लागले. यामुळे त्रस्त होऊन विक्रम शेतात गेला. तेथे त्याने आपल्या मोबाईलवर एक सुसाइड नोट लिहिली आणि ती फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर १० मिनिटांनी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

वडिलांनी दुसरीकडे ठरवले होते लग्न

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचे लग्न दुसरीकडे ठरवले होते आणि कटरा समानचे लोक जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होते. याच त्रासातून त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश