शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:47 IST

पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कारणावरून पतीने आत्महत्या केल्याची घटना घणसोलीत घडली आहे. बंद घरातून दुर्गंधी येवू लागल्याच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीमुळे तीन दिवसांनी हा प्रकार उघड झाला.

नवी मुंबई -  पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कारणावरून पतीने आत्महत्या केल्याची घटना घणसोलीत घडली आहे. बंद घरातून दुर्गंधी येवू लागल्याच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीमुळे तीन दिवसांनी हा प्रकार उघड झाला. परंतु पती-पत्नीमधील वादाचे नेमके कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही.शंकर कोळेकर (४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घणसोली येथील शंकरबुवा वाडी परिसरात ते सहकुटुंब राहायला होते. दीपावलीच्या काही दिवस अगोदर त्यांचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला. या कारणातून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्याचा मनस्ताप झाल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाºयांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याचे उपनिरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले. त्यानुसार पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र पती-पत्नीमधील भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचेही उपनिरीक्षक पवार यांनी सांगितले. घणसोली परिसरातच १ नोव्हेंबर रोजी अश्विनकुमार कुसवाह (२७) यानेही गळफास लावून आत्महत्या केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र