शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खिचडीत मीठ जास्त झाल्याने गळा आवळून पतीने केली पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:05 IST

गेले १५ दिवस घरगुती कारणावरून भांडण सुरु असतानाच शुक्रवारी साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीची गळा आवळून निघृण हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - गेले १५ दिवस घरगुती कारणावरून भांडण सुरु असतानाच शुक्रवारी साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीची गळा आवळून निघृण हत्या केली . त्या नंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीची हत्या केल्याचे सांगितले . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच ह्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे . फिर्यादी नुसार माळोदे हे सकाळी पोलीस ठाण्यात असताना पावणे दहाच्या सुमारास एक इसम आला  व त्याने स्वतःच्या पत्नी निर्मला (४०) हिचा गळा आवळला आहे असे सांगितलॆ .  पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता निकेश राजाराम घाग (४६) रा . रोहीणी अपार्टमेंट, गोडदेव नाका असे त्याने सांगितले.  पोलिसांनी त्याला घेऊन रोहिणी इमारत गाठली असता तेथे लोकांची गर्दी झाली होती . तर निर्मला यांना रिक्षातुन नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरने त्या मरण पावल्या असल्याचे सांगितले . 

निर्मला यांचा भाऊ प्रभाकर गुरव यांच्या कडे पोलिसांनी माहिती घेतली असता , गेल्या १५ दिवसां पासून निकेश व निर्मला यांच्यात घरगुती कारणांनी भांडण सुरु होते . निकेश व निर्मला यांचा मुलगा चिन्मय (१२) ह्याने सकाळची घटना आजी शेवंती गुरव यांना कॉल करून रडत रडत सांगितली.  एका बँकेत काम करणाऱ्या निकेशचा शुक्रवारचा उपवास असल्याने निर्मला यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती . परंतु खिचडीत मीठ जास्त झाल्याचे कारणावरून निकेशने पत्नी सोबत बेडरूम मध्ये भांडण सुरु केली . त्यांना मारहाण करत खाली पाडले व हाताने गळा आवळू लागला . पत्नीने प्रतिकार केला असता गॅलरीतील नायलॉनची दोरी आणून त्याने पत्नी निर्मलाचा गळा आवळला . चिमुरड्या चिन्मय ने आपल्या आईला वाचवण्यासाठी प्रयत्न केले व तो वडिलांना आईला सोडा म्हणून सांगत होता . परंतु खुनशी निकेश ने मुलाच्या रडण्याचा आकांत देखील विचारात घेतला नाही. निर्मला ह्या निपचित पडलेल्या पाहून निकेश घरातून निघून गेला. 

नातवाने कॉल करून घटना सांगितल्या नंतर मुलीच्या काळजीने आईचा जीव कासावीस झाला व त्यांनी तात्काळ मुलगा प्रभाकर ह्याला घटनास्थळी जाण्यास सांगितले . प्रभाकर हे पत्नी व मित्र दिनेश सह बहिणीच्या घरी पोहचले असता बहीण निर्मला निपचित पडलेल्या होत्या. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निकेश ह्याला अटक केली आहे . ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर