शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

महाराष्ट्रातील मुलीची बंगळुरूत हत्या; २४ तासांत पोलिसांनी प्रोजेक्ट मॅनेजरला कसं पकडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:42 IST

डीसीपी सारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. बंगळुरू पोलीस संध्याकाळच्या विमानाने पुण्यात पोहचली. 

बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू येथे महाराष्ट्रातील मुलीच्या हत्येने खळबळ माजली आहे. याठिकाणी ३६ वर्षीय आरोपी पतीने ३२ वर्षीय पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आणि घरातून पळ काढला. या आरोपीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. मयत पत्नीचे नाव गौरी सांबेकर असं आहे. ती मास मिडिया ग्रॅज्युएट असून ती नोकरीच्या शोधात होती. या आरोपीचं नाव राकेश खेडेकर असं आहे. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. अलीकडेच हे दोघं बंगळुरूतील दोडुकम्मनहल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते. 

मुंबईतून आले होते बंगळुरूला...

माहितीनुसार, हे जोडपे मुंबईतून बंगळुरूला आले होते. ते शहरात कधी शिफ्ट झाले हे अद्याप समोर आले नाही. पत्नी गौरीची हत्या करून पती राकेश पळाला होता. बंगळुरूहून तो कारने पुण्याला पोहचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. आरोपी पतीला बंगळुरूला परत नेले जात आहे. राकेशने गुरूवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास त्याच्या घर मालकाला फोन केला होता. काल रात्री मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि शहर सोडून चाललोय असं त्याने घर मालकाला सांगितले. त्याशिवाय पोलिसांना हे सांगा आणि तिच्या घरच्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कळवा असंही आरोपीने घरमालकाला म्हटलं.

घर मालकाला बसला धक्का

आरोपी राकेशचं फोनवरचं बोलणं ऐकून घर मालकाला धक्का बसला. त्याने तातडीने घर गाठलं तेव्हा तिथे दरवाजा बंद असल्याचं दिसले. त्याने ११२ या हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हुलिमावु पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा गौरीचा मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवल्याचं दिसून आले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी राकेशचा मोबाईल ट्रेस केला. डीसीपी सारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. बंगळुरू पोलीस संध्याकाळच्या विमानाने पुण्यात पोहचली. 

रात्री ९.३० च्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या हत्येमागचं कारण शोधलं जात आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर राकेशने गौरीच्या आई वडिलांना फोन करून माहिती दिली. राकेश आणि गौरी यांचं २ वर्षापूर्वी लग्न झालं असून दोघेही वर्क फ्रॉम होम करायचे. लग्नानंतर काही काळातच वारंवार या दोघांमध्ये भांडणे व्हायची. अखेर या दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि राकेशने गौरीला कायमचा संपवला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी