शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! पतीच्या शरीराचे तुकडे करून विल्हेवाट लावत होती पत्नी, तेव्हाच झाला धमाका आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:19 IST

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटच्या आत मृतदेहाचे तुकडे पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवले.

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. पण बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या. आरोप आहे की, महिलेने आपल्या प्रियकरासोबत आणि बहीण व भाओजीसोबत मिळून आधी पतीची हत्या केली. नंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्यावर केमिकल टाकून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

इथे ३० वर्षीय राकेशच्या हत्येचा आऱोप त्याची पत्नी राधा, प्रियकर सुभाष आणि बहीण व भाओजीवर आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेचा प्रियकर सुभाषने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये मृतदेहाचे अनेक तुकडे केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी केमिकलचा वापर केला. पण तेव्हाच मोठा धमाका झाला. ज्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : खुलासा! डॉक्टरची पत्नी आणि जिम ट्रेनरमध्ये काय होतं नातं? ११०० झालं होतं बोलणं...)

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटच्या आत मृतदेहाचे तुकडे पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवले आणि प्रकरणाची फॉरेन्सिक टीमकडून चौकशी सुरू केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मृत  राकेश हा बिहारमध्ये दारूबंदीनंतरही बेकायदेशीरपणे दारूचा धंदा करत होता. त्यामुळे तोही पोलिसांच्या रडारवर होता. त्यामुळे तो जास्तीत जास्त काळ लपून राहत होता. 

यादरम्यान राकेशचा साथीदार सुभाष त्याच्या पत्नीची देखरेख करत होता. काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर महिला राधाने प्रियकरासोबत मिळून पतीला मारण्याचा प्लॅन केला. ज्यात तिची बहीण आणि भाओजीही सामिल होते. राधाने पतीला घरी बोलवलं आणि प्रियकर सुभाषसोबत मिळून त्याची हत्या केली. (हे पण वाचा : अशीही फसवणूक! पत्नी लाखो रूपये घेऊन परदेशात गेली, पतीचा फोन उचलणंही केलं बंद...)

राकेशच्या हत्येनंतर त्याचा भाऊ दिनेशने पोलीस स्टेशनमध्ये राकेशची पत्नी राधा देवी, तिचा प्रियकर सुभाष, बहीण कृष्णा आणि तिचा पती यांच्यावर हत्येचा आरोप लावत तक्रार दिली. मृतकाचा भाऊ दिनेश म्हणाला की, त्याच्या मोठ्या भावाचा सहयोगी सुभाषसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. राकेशच्या भावाने आरोप लावला की, त्याच्या भावाच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत सर्वांनाच माहिती होती. दिनेशने सांगितल्याप्रमाणे राकेश काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी परतला होता आणि भाड्याच्या घरात राहत होता.

दिनेशने सांगितलं की, शनिवारी त्या घरात अचानक धमाका झाला. तिथे जाऊन पाहिलं तर समजलं की, माझ्या भावाची हत्या करण्यात आणि मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचं कारण मृतकाच्या पत्नीचे सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी