शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

धक्कादायक! पतीच्या शरीराचे तुकडे करून विल्हेवाट लावत होती पत्नी, तेव्हाच झाला धमाका आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:19 IST

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटच्या आत मृतदेहाचे तुकडे पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवले.

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. पण बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या. आरोप आहे की, महिलेने आपल्या प्रियकरासोबत आणि बहीण व भाओजीसोबत मिळून आधी पतीची हत्या केली. नंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्यावर केमिकल टाकून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

इथे ३० वर्षीय राकेशच्या हत्येचा आऱोप त्याची पत्नी राधा, प्रियकर सुभाष आणि बहीण व भाओजीवर आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेचा प्रियकर सुभाषने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये मृतदेहाचे अनेक तुकडे केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी केमिकलचा वापर केला. पण तेव्हाच मोठा धमाका झाला. ज्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : खुलासा! डॉक्टरची पत्नी आणि जिम ट्रेनरमध्ये काय होतं नातं? ११०० झालं होतं बोलणं...)

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटच्या आत मृतदेहाचे तुकडे पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवले आणि प्रकरणाची फॉरेन्सिक टीमकडून चौकशी सुरू केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मृत  राकेश हा बिहारमध्ये दारूबंदीनंतरही बेकायदेशीरपणे दारूचा धंदा करत होता. त्यामुळे तोही पोलिसांच्या रडारवर होता. त्यामुळे तो जास्तीत जास्त काळ लपून राहत होता. 

यादरम्यान राकेशचा साथीदार सुभाष त्याच्या पत्नीची देखरेख करत होता. काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर महिला राधाने प्रियकरासोबत मिळून पतीला मारण्याचा प्लॅन केला. ज्यात तिची बहीण आणि भाओजीही सामिल होते. राधाने पतीला घरी बोलवलं आणि प्रियकर सुभाषसोबत मिळून त्याची हत्या केली. (हे पण वाचा : अशीही फसवणूक! पत्नी लाखो रूपये घेऊन परदेशात गेली, पतीचा फोन उचलणंही केलं बंद...)

राकेशच्या हत्येनंतर त्याचा भाऊ दिनेशने पोलीस स्टेशनमध्ये राकेशची पत्नी राधा देवी, तिचा प्रियकर सुभाष, बहीण कृष्णा आणि तिचा पती यांच्यावर हत्येचा आरोप लावत तक्रार दिली. मृतकाचा भाऊ दिनेश म्हणाला की, त्याच्या मोठ्या भावाचा सहयोगी सुभाषसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. राकेशच्या भावाने आरोप लावला की, त्याच्या भावाच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत सर्वांनाच माहिती होती. दिनेशने सांगितल्याप्रमाणे राकेश काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी परतला होता आणि भाड्याच्या घरात राहत होता.

दिनेशने सांगितलं की, शनिवारी त्या घरात अचानक धमाका झाला. तिथे जाऊन पाहिलं तर समजलं की, माझ्या भावाची हत्या करण्यात आणि मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचं कारण मृतकाच्या पत्नीचे सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी