शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामी यांना लष्कराची संवेदनशील माहिती मिळतेच कशी?, अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 17:47 IST

Anil Deshmukh on Arnab Goswami : अर्णब- पार्थो दासगुप्ता ‘चॅट’प्रकरणी गंभीर दखल

ठळक मुद्देअनिल देशमुख मंगळवारी मुंबईत घेणार महत्त्वाची बैठक

नाशिक : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

सोमवारी अनिल देशमुख हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत दुपारी त्यांनी संवाद साधला. अर्णव गोस्वामी आणि पार्थोदास गुप्ता यांना लष्करी कारवाईबाबतची माहिती तसेच पुलवामा हल्ल्याबाबतची माहिती कशी मिळते? असा प्रश्न देशमुख यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. अर्णव व पार्थोदासच्या संभाषणामधून अत्यंत संवेदनशील बाबी समोर आली आहे. याबाबत राज्य सरकारकडून संपुर्ण माहिती घेतली जात असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. अर्णव यांना संवेदनशील व गोपनीय माहिती मिळालीच कशी? याचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती या दोघांच्या संभाषणामधून पुढे आल्याने केंद्र व राज्य सरकारदेखील सतर्क झाले असून त्याबाबत कसून चौकशी व तपास केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर मंगळवारी मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

‘सर्जिकल स्ट्राइक’बाबतही होती माहिती

जम्मु काश्मिरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत गोपनीय पध्दतीने केंद्र सरकार व भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून लष्करी कारवाईची (बालाकोट सर्जिकल स्ट्राइक) माहिती थेट रिपब्लिक टीव्ही’चे अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत कशी पोहचली आणि त्यांनी याबाबत ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांच्याशी याबाबत संवाद साधत माहितीची देवाणघेवाण केल्याचेही पुढे आले आहे. एकुणच ‘टीआरपी’ घोटाळ्याच्या तपास आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या संपुर्ण घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखarnab goswamiअर्णब गोस्वामीNashikनाशिकHome Ministryगृह मंत्रालय