शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

होमगार्डचे थकीत मानधनाबाबत वित्त विभागाचा खोडा; तिजोरीत खडखडाटीने मागणीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 20:19 IST

राज्यातील ४२ हजारावर होमगार्डच्या गेल्या पाच महिन्यांपासूनच्या थकीत मानधनाचा प्रश्न प्रशासनाच्या निगरघट्टपणामुळे अद्याप प्रलंबित राहिला आहे.

जमीर काझीमुंबई : राज्यातील ४२ हजारावर होमगार्डच्या गेल्या पाच महिन्यांपासूनच्या थकीत मानधनाचा प्रश्न प्रशासनाच्या निगरघट्टपणामुळे अद्याप प्रलंबित राहिला आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत त्यांच्या हक्काच्या निधीवर वित्त विभागाने खोडा घातला आहे. त्यांची मंजुरी भागविण्यासाठी २७८ कोटीच्या निधीची गरज असताना तूर्तास २८ कोटीची मान्यता देत त्यांची बोळवण करण्याचा प्रस्ताव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडला आहे.मात्र त्याबाबतही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे होमगार्डच्या थकीत मानधनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी गृहरक्षक दलाच्या जवानांकडून होत आहे. अन्यथा त्यासाठी कुटुंबियांसह प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा होमगार्ड संघटनांकडून देण्यात आला आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी कार्यरत असलेले पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने त्यांना बंदोबस्तांच्या कामामध्ये होमगार्डकडून सहकार्य केले जाते. मानधन तत्वावर कार्यरत असलेले हे जवान विविध सण, उत्सव, निवडणूका, सभा, महोत्सवावेळी ते पोलिसांच्या बरोबरीने राबत असतात. गेल्या सप्टेंबरपासूनचे १३७ कोटी ८३ लाखाचे मानधन थकले असून या आर्थिक वर्षअखेरीसपर्यत आणखी १४० कोटी ५५ लाख रुपये म्हणजे एकुण २७८ कोटी ३८ लाखाची आवश्यकता लागणार आहे. मात्र महासमादेशक कार्यालयाकडे जवानांचे मानधन भागविण्यासाठी एक कवडीही शिल्लक नाही. ‘लोकमत’ने त्यांची व्यथा २० जानेवारीच्या अंकात मांडली होती. मात्र तेव्हापासून गृह व वित्त विभागामध्ये केवळ चर्चाच सुरु असून त्यांच्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे होमगार्डमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने थकीत मानधन न दिल्यास त्यांच्या निषेधार्थ प्रत्येक जिल्हा घटकामध्ये कुटुंबियासमवेत आंदोलन करण्याचा निर्धार त्यांच्यातून व्यक्त होत आहे.-------होमगार्डंनी सप्टेंबर ते डिसेंबरपर्यत बंदोबस्तांचे थकीत मानधन १३८ कोटीचे मानधन थकले असताना वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयाकडून २८ कोटीचा निधी पुरवून तात्पुरती बोळवण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. मात्र या रक्कमेतून एका जिल्ह्यातील जवानांची थकबाकी भागविता येणार नाही. त्यामुळे अल्प मानधनावर राबित असलेल्या दुर्लक्षित घटकाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गांर्भियाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.-----------------------...तर कुटुंबियांसह रस्त्यावर उतरणारपाच महिन्यांहून हक्काची मजुरी मिळत नसल्याने होमगार्ड जवान हवालदिल झाले आहेत.वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा उर्दहनिर्वाह चालविणे अशक्य बनले आहे. उधारउसनवारी भागवायची असल्याने आता त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने तातडीने थकीत मानधनाची पूर्तता न केल्यास प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जाईल. कुटुंबियांसह रस्त्यावर उतरुन न्याय हक्कासाठी लढा दिला जाईल.- एन.डी.खानजोडे ( राज्य महासचिव, आॅल इंडिया होमगार्ड असोसिएशन)