शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Pakistan, Hindu Woman Murder: संतापजनक! पाकिस्तानात हिंदू महिलेशी किळसवाणे वर्तन, नंतर केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:33 IST

विधवा महिलेवर अतिप्रसंग, मृतदेहाशी केली छेडछाड

Hindu Woman assaulted Murdered in Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय संबंध गेली अनेक वर्ष तणावपूर्ण आहेत. पाकिस्तान हे जरी मुस्लीम राष्ट्र असले तरी तेथे अनेक हिंदू कुटुंब अजूनही वास्तव्यास आहेत. पाकिस्तानात हिंदू लोकांवर अत्याचार केले जातात असा आरोप भारताने अनेक वेळा केला आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतही भारताने या मुद्द्यावर अनेक वेळा भाष्य केले आहे. मात्र तरीही पाकिस्तान सुधरण्यास तयार नाही. पाकिस्तानमध्ये एका हिंदू महिलेच्या हत्येची घटना घडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

नक्की काय घडले?

एका हिंदू महिलेवर आधी बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्या महिलेचे शिर धडापासून वेगळे कापण्यात आले. महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले. हत्येनंतर महिलेचा मृतदेह शेतात फेकून देण्यात होता. पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेवर झालेल्या अतिप्रसंगाबाबत आणि संतापजनक कृतीबाबत भारताने तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला आहे.

पाकिस्तानात कुठे घडला हा प्रकार?

हे प्रकरण पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. महिलेच्या हत्येनंतर हिंदू खासदार कृष्णा कुमारी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. कृष्णा कुमारी यांनी घटनास्थळी लोकांशी संवाद साधून मदतीचे आश्वासन दिले. कृष्णा कुमारी यांनी ट्विट केले की, ४० वर्षीय विधवा महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अत्यंत वाईट अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. हल्लेखोरांनी महिलेच्या मृतदेहाशी छेडछाड केली होती. सिंढोरो आणि शाहपूरचाकर येथील पोलिसांच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली होती.

भारताने पाकिस्तानला सुनावले!

पाकिस्तानने आपल्या देशात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी आणि आपली सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पाकिस्तानला सुनावले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, पाकिस्तानने अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी, असे आम्ही वारंवार सांगतो. त्यांची सुरक्षा ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. पाकिस्तानने अल्पसंख्याकांचे रक्षण करावे, एवढेच आम्ही सध्या तरी सांगतोय, असे ते म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत