शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त बळी हार्बर लाईनवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 3:26 PM

दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून  मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे.

मुंबई - मुंबईची उपनगरी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन आहे. दररोज 80 लाखापेक्षा जास्त  प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरेच गर्दी असते,  ज्यामुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले करतबबाजी करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून  मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांचे कार्यालयात रेल्वेच्या ओवरहेड वायर पासून शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहे. याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी वसंतराव शेटे यांनी माहिती शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2013 पासून मे 2018 पर्यंत ओवरहेड वायर पासून शॉक लागून एकूण 143 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 138 प्रवासी  जखमी झाले आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थाकांन दरम्यान एकूण 67 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 52 प्रवासी  जखमी झाले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थाकांन दरम्यान  एकूण 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 31 प्रवासी  जखमी झाले आहे. तसेच हार्बर रेल्वेच्या संडहर्स्ट रोड ते पनवेल  स्थाकांन दरम्यान एकूण 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 39 प्रवासी  जखमी झाले आहे. सर्वात जास्त ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थाकांन दरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण 11  प्रवाशांचा मृत्यू व 6 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण 5  प्रवाशांचा मृत्यू व 14 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये 2017 साली रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 3014 प्रवासी मृत्यू पावले. आणि रेल्वेनगाड्यातून पडून  3345 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच मध्य रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 1534 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून  1435 प्रवासी जखमी झाले आहे. आणि पश्चिम  रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 1086 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून  1540  प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर उपनगरीय  रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 394 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून  370 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यातून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी  कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. अशा अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्टर स्थानिक हमाल व स्वयंसेवी सेवकांची मदत घेतात.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते  हार्बर लाईनवर ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याचे मुख्य कारण आहे कि, हार्बर लाईनवर ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत. तसेच दुसरे कारण आहे कि,  गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणारी तरुण मुले ट्रेनच्या छतावर करतबबाजी करताना आपले जीव गमावतात. गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणाऱ्या रहिवासी यांनी आप-आपल्या  मुलांना ताकीद देण्याची गरज आहे कि, ट्रेनच्या छतावर प्रवास करू नये आणि करतबबाजीसुद्धा करू नये. तसेच  शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना अपील केले आहे कि, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेयरमन अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून हार्बर लाईनवर गाड्याच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वेDeathमृत्यू