शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 21:50 IST

Salary increment demand turns into kidnapping plot : गांधीनगर गुन्हे शाखेने या प्रकरणात महिला शिक्षिकेच्या 35 वर्षीय शेजारी मितुल पटेल याला अटक केली आहे.

अहमदाबाद - गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात अपहरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथील कलोल भागात पंचवटी स्थित सरस्वती सहकारी समितीत अपहरणाची घटना घडली. एक व्यक्ती सोलर पॅनलमध्ये मीटर रीडिंगचं कारण सांगून महिला शिक्षिकेच्या घरी आला. नंतर संधी साधून अन्य मुले देखील महिला शिक्षिकेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेच्या तोंडावर टेप चिकटवलं आणि हात-पाय बांधले आणि सांगितलं तुझं अपहरण झालं आहे. 

गांधीनगर गुन्हे शाखेने या प्रकरणात महिला शिक्षिकेच्या 35 वर्षीय शेजारी मितुल पटेल याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितुल पटेल याने 30 मार्च रोजी वेतन वाढवण्याची मागणी करणाऱ्या आपल्या 4 कर्मचारी आणि अन्य तिघांसोबत मिळून शेजारी राहणाऱ्या महिला शिक्षकाच्या अपहरणाची कट आखला. पीडित महिला शिक्षिका (56) अलका रस्तोगी तपोवन सर्कलजवळ एका शाळेत नोकरी करते. पोलिसांनी घटनाक्रमाचा खुलासा करताना सांगितलं की, बुधवारी दुपारी ती आपल्या सरस्वती सोसायटी स्थित घरात एकटी होती. त्यावेळी सौरभ कुमार नावाच्या तरुणाचं नाव समोर आलं आहे. त्यानेच दार ठोठावलं. जेव्हा अलकाने दार उघडले तर सौरभने सांगितले की, तो सोलर पॅनलची मीटर रीडिंग घेण्यासाठी आला आहे. महिला शिक्षकाने तेव्हा मुलाला आत घेतले. यानंतर अन्य सातजण देखील अलका रस्तोगीच्या घरात घुसले आणि तिचं अपहरण केलं.

आरोपींनी शिक्षिकेला जबरदस्तीने एका गाडीत बसवलं आणि तिचं तोंड टेपने बांधलं. काही वेळ गाडी चालवल्यानंतर आरोपींनी महिलेचा पती प्रदीप रस्तोगी याला फोन केला. प्रदीप रस्तोगी चतरालमध्ये फॅक्टरी चालवतात. त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही आणि कॉल बॅकदेखील केला नाही. प्रदीप रस्तोगी घरी आले आणि पत्नी दिसली नाही हे पाहून त्याने पोलिसांनी संपर्क केला आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांमध्ये तक्रार केल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या रेस्टॉरंट मालक मितुल पटेल याला कळताच तो घाबरला आणि 31 मार्चच्या सकाळी साधारण 4.30 वाजता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षिकेला निर्जनस्थळी सोडून फरार झाला. यानंतर शिक्षिका अलकाने आपला पती प्रदीपशी संपर्क केला. यानंतर दाम्पत्याने मिळून पोलिसात अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. अपहरणासाठी वापरण्यात आलेली गाडी शेजारी मितुल पटेल याची होती. 

चौकशीत पटेलने आपला गुन्हा कबुल केला असून त्याने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या रेस्टॉरंटमधील वेटर निलेश, देवेंद्र, बल्लू आणि सौरभच्या मदतीने हा गुन्हा करण्यात आला. मितुल पटेलच्या रेस्टॉरंट स्टाफने 23 मार्च रोजी त्यांच्याकडून पगार वाढीची मागणी केली होती. पटेलने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की, तो एक गंभीर आर्थिक संकटात अडकला आहे आणि यातून बाहेर पडण्याचा शोध घेत होती. यानंतर वेटर निलेशने हा अपहरणाचा कट आखला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसArrestअटकKidnappingअपहरण