शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नवरी जोमात, नवरा कोमात! बँड-बाजा, वरात घेऊन ५ तास पाहिली वाट, पण 'तिने' दाखवला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:45 IST

दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

दुबईत काम करणाऱ्या २४ वर्षीय दीपकला इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मुलीशी लग्न करण्याचा विचार महागात पडला आहे. दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तो ज्या वधूसोबत लग्न करण्यासाठी आला होता ती बेपत्ता होती. आता नवरदेवाच्या कुटुंबीयांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दीपकने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका मुलीला भेटला होता. तिने मनप्रीत कौर असं तिचं नाव सांगितलं. दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पालक फोनवर एकमेकांशी बोलत होते. ६ डिसेंबर २०२४ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दीडशे पाहुण्यांची वरात घेऊन दीपक मनप्रीतने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला.

मोगा येथे पोहोचल्यानंतर त्याला कळालं की मुलीने सांगितलेलं ठिकाण प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीपकने मनप्रीतला अनेकवेळा फोन केला. सुरुवातीला तिने फोन उचलला आणि सांगितलं की, लग्नाची वरात हॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी तिचे काही नातेवाईक येतील. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणीही आलं नाही. नवरीचा फोनही बंद होता. पाच तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गेले.

दीपकने तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, तो दुबईत राहतो. तीन वर्षांपूर्वी मनप्रीत कौरसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केलं आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांशीही फोनवर बोलणे झालं, त्यानंतर ६ डिसेंबरला लग्न ठरलं. मनप्रीतने ती फिरोजपूरमधील एक चांगली वकील असल्याचं सांगितलं होतं. दीपकने पोलिसांना सांगितले की, मी तिला कधीही वैयक्तिकरित्या भेटलो नाही, पण तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहिले आहेत. आता मला शंका आहे की, ते फोटो खरे आहेत की नाही.

नवरदेवाने सांगितलं की, त्याने मनप्रीतला ५०००० रुपये देखील ट्रान्सफर केले होते. लग्नाच्या खर्चात मदत म्हणून तिने हे पैसे मागितले होते. नवरदेवाचे वडील प्रेम चंद यांनी सांगितलं की, त्यांनी वधूच्या आईशी फोनवर बोलून लग्न निश्चित केलं होतं, परंतु ते तिच्या कुटुंबातील कोणालाही प्रत्यक्ष भेटले नाहीत. आमची फसवणूक झाली आहे. आम्ही १५० पाहुणे आणि वरात घेऊन आलो होतो. लग्नासाठी बराच पैसा खर्च केला आहे. आम्हाला न्याय हवा आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPunjabपंजाब