शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नवरी जोमात, नवरा कोमात! बँड-बाजा, वरात घेऊन ५ तास पाहिली वाट, पण 'तिने' दाखवला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:45 IST

दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

दुबईत काम करणाऱ्या २४ वर्षीय दीपकला इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मुलीशी लग्न करण्याचा विचार महागात पडला आहे. दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तो ज्या वधूसोबत लग्न करण्यासाठी आला होता ती बेपत्ता होती. आता नवरदेवाच्या कुटुंबीयांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दीपकने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका मुलीला भेटला होता. तिने मनप्रीत कौर असं तिचं नाव सांगितलं. दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पालक फोनवर एकमेकांशी बोलत होते. ६ डिसेंबर २०२४ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दीडशे पाहुण्यांची वरात घेऊन दीपक मनप्रीतने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला.

मोगा येथे पोहोचल्यानंतर त्याला कळालं की मुलीने सांगितलेलं ठिकाण प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीपकने मनप्रीतला अनेकवेळा फोन केला. सुरुवातीला तिने फोन उचलला आणि सांगितलं की, लग्नाची वरात हॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी तिचे काही नातेवाईक येतील. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणीही आलं नाही. नवरीचा फोनही बंद होता. पाच तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गेले.

दीपकने तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, तो दुबईत राहतो. तीन वर्षांपूर्वी मनप्रीत कौरसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केलं आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांशीही फोनवर बोलणे झालं, त्यानंतर ६ डिसेंबरला लग्न ठरलं. मनप्रीतने ती फिरोजपूरमधील एक चांगली वकील असल्याचं सांगितलं होतं. दीपकने पोलिसांना सांगितले की, मी तिला कधीही वैयक्तिकरित्या भेटलो नाही, पण तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहिले आहेत. आता मला शंका आहे की, ते फोटो खरे आहेत की नाही.

नवरदेवाने सांगितलं की, त्याने मनप्रीतला ५०००० रुपये देखील ट्रान्सफर केले होते. लग्नाच्या खर्चात मदत म्हणून तिने हे पैसे मागितले होते. नवरदेवाचे वडील प्रेम चंद यांनी सांगितलं की, त्यांनी वधूच्या आईशी फोनवर बोलून लग्न निश्चित केलं होतं, परंतु ते तिच्या कुटुंबातील कोणालाही प्रत्यक्ष भेटले नाहीत. आमची फसवणूक झाली आहे. आम्ही १५० पाहुणे आणि वरात घेऊन आलो होतो. लग्नासाठी बराच पैसा खर्च केला आहे. आम्हाला न्याय हवा आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPunjabपंजाब