शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नवरी जोमात, नवरा कोमात! बँड-बाजा, वरात घेऊन ५ तास पाहिली वाट, पण 'तिने' दाखवला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:45 IST

दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

दुबईत काम करणाऱ्या २४ वर्षीय दीपकला इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मुलीशी लग्न करण्याचा विचार महागात पडला आहे. दीपक बँड, बाजा आणि लग्नाची वरात घेऊन पंजाबमधील मोंगा येथे पोहोचला, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तो ज्या वधूसोबत लग्न करण्यासाठी आला होता ती बेपत्ता होती. आता नवरदेवाच्या कुटुंबीयांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दीपकने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका मुलीला भेटला होता. तिने मनप्रीत कौर असं तिचं नाव सांगितलं. दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पालक फोनवर एकमेकांशी बोलत होते. ६ डिसेंबर २०२४ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दीडशे पाहुण्यांची वरात घेऊन दीपक मनप्रीतने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला.

मोगा येथे पोहोचल्यानंतर त्याला कळालं की मुलीने सांगितलेलं ठिकाण प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीपकने मनप्रीतला अनेकवेळा फोन केला. सुरुवातीला तिने फोन उचलला आणि सांगितलं की, लग्नाची वरात हॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी तिचे काही नातेवाईक येतील. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणीही आलं नाही. नवरीचा फोनही बंद होता. पाच तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गेले.

दीपकने तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, तो दुबईत राहतो. तीन वर्षांपूर्वी मनप्रीत कौरसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केलं आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांशीही फोनवर बोलणे झालं, त्यानंतर ६ डिसेंबरला लग्न ठरलं. मनप्रीतने ती फिरोजपूरमधील एक चांगली वकील असल्याचं सांगितलं होतं. दीपकने पोलिसांना सांगितले की, मी तिला कधीही वैयक्तिकरित्या भेटलो नाही, पण तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहिले आहेत. आता मला शंका आहे की, ते फोटो खरे आहेत की नाही.

नवरदेवाने सांगितलं की, त्याने मनप्रीतला ५०००० रुपये देखील ट्रान्सफर केले होते. लग्नाच्या खर्चात मदत म्हणून तिने हे पैसे मागितले होते. नवरदेवाचे वडील प्रेम चंद यांनी सांगितलं की, त्यांनी वधूच्या आईशी फोनवर बोलून लग्न निश्चित केलं होतं, परंतु ते तिच्या कुटुंबातील कोणालाही प्रत्यक्ष भेटले नाहीत. आमची फसवणूक झाली आहे. आम्ही १५० पाहुणे आणि वरात घेऊन आलो होतो. लग्नासाठी बराच पैसा खर्च केला आहे. आम्हाला न्याय हवा आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPunjabपंजाब