शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

यवतमाळ: ग्रामसेविकेने केला १४ लाखांचा अपहार; शासकीय योजनेत भ्रष्टाचार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:40 IST

तालुक्यातील हुडी(बु.) येथील महिला ग्राम सचिवाने शासनाच्या विविध योजनेतील निधीत सुमारे १४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत पुढे आले.

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील हुडी(बु.) येथील महिला ग्राम सचिवाने शासनाच्या विविध योजनेतील निधीत सुमारे १४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत पुढे आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिता दिगंबर आगासे, असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हुडी (बु.) येथील ग्रामपंचायत त्या मागील चार वर्षांपासून कार्यरत आहे. गावासाठी स्वच्छ भारत मिशन, १४ वा वित्त आयोग, बळीराजा चेतना अभियान, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, पाणीपुरवठा निधी व सामान्य निधी, अशा विविध शासकीय योजनेतून निधी आला. यात आगासे यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर तत्कालीन गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी पंचायत समिती सदस्य रामेश्वर जाधव, समूह समन्वयक तुळशीराम दत्ता चव्हाण, विस्तार अधिकारी एस.बी. बिलवाल, कनिष्ठ अभियंता संजय तालपेलवार, कनिष्ठ लेखाधिकारी यांची चौकशी समिती गठित केली होती.

चौकशी समितीने अपहाराची सखोल चौकशी केली. त्यानंतर अहवाल सादर केला. अहवालानुसार ग्रामसेविका अनिता आगासे यांनी स्वच्छ भारत मिशनमध्ये दोन लाख चार हजार रुपये, सामान्य निधीत ७५ हजार ३०० रुपये, १४ वा वित्त आयोगमध्ये ६५ हजार २१० रुपये, बळीराजा चेतना अभियानात ८३ हजार ८१८ रुपये, दलित वस्ती सुधार योजनेत तीन लाख ६० हजार ७२७ रुपये, तांडा वस्ती सुधार योजनेत १५ हजार ३१३ रुपये आणि पाणीपुरवठा निधीमध्ये ४२ हजार ३०० रुपये, असा एकूण १४ लाख ३४ हजार ३६६ रुपयांचा अपहार केल्याचे सिध्द झाले. 

चौकशी अहवालानंतर विस्तार अधिकारी व्ही.सी. कोषटवार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिता आगासे यांच्याविरुद्ध शासकीय योजनेत आर्थिक अपहार केल्याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी भादंवि ४२०, ४६८, ४७०, ४७१, नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी