शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

गोलमाल है भाई सब गोलमाल है! कागदावरच बनवलं बोगस गाव; ५५ योजना आणून ४५ लाख लाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:51 IST

खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे. 

पंजाबच्या फिरोजपूर इथं सरकारी तिजोरीतील पैसे लाटण्याचा अजब गजब प्रकार समोर आला आहे. २०१९ साली राज्यात काँग्रेस सरकार होते, तेव्हा एका सामाजिक कार्यकर्त्याला याची भनक लागली. याठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी कागदावरच एक बोगस गाव बनवून योजनेतील लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिरोजपूरच्या या कागदावरील गावात विकासाच्या नावाखाली ४५ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला ज्याचा खुलासा ५ वर्षांनी आरटीआयमधून उघड झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कसा झाला घोटाळा?

२०१९ पासून सरकारी अधिकाऱ्यांनी फिरोजपूरच्या परिसरात कागदावरच एक नवीन गाव वसवून त्याची बोगस ग्रामपंचायत स्थापन केली. बोगस ग्रामपंचायतीला खऱ्या ग्रामपंचायतीपेक्षा अधिकचा निधी वितरीत करण्यात आला. या बोगस गावाने केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांमधून ४५ लाख रुपये लाटले. हे सर्व पैसे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा आरोप होत आहे.

अधिकाऱ्यांनी पैसे लाटण्यासाठी नवी गुट्टी नावाने बोगस ग्रामपंचायत बनवली होती. त्यात ५५ योजनाही सुरू करण्यात आल्या. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा समावेश होता. या योजनेतून ४५ लाख रुपये हडप करण्यात आले. तर दुसरीकडे नवी गट्टी नावाची खरोखरची ग्रामपंचायत होती तिथे केवळ ३५ योजना सुरू केल्या होत्या. खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे. 

दरम्यान, हे प्रकरण उघड होताच अकाली दलाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. जर सरकारकडे ठोस पुरावे असतील तर दोषींवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अकाली दलाचे प्रवक्ते दलजीत चीमा यांनी केली आहे. या प्रकरणी तपास सुरू असून जे कुणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं ADC अधिकारी लखविंदर सिंह रंधावा यांनी म्हटलं. 

टॅग्स :fraudधोकेबाजी