शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

गोलमाल है भाई सब गोलमाल है! कागदावरच बनवलं बोगस गाव; ५५ योजना आणून ४५ लाख लाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:51 IST

खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे. 

पंजाबच्या फिरोजपूर इथं सरकारी तिजोरीतील पैसे लाटण्याचा अजब गजब प्रकार समोर आला आहे. २०१९ साली राज्यात काँग्रेस सरकार होते, तेव्हा एका सामाजिक कार्यकर्त्याला याची भनक लागली. याठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी कागदावरच एक बोगस गाव बनवून योजनेतील लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिरोजपूरच्या या कागदावरील गावात विकासाच्या नावाखाली ४५ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला ज्याचा खुलासा ५ वर्षांनी आरटीआयमधून उघड झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कसा झाला घोटाळा?

२०१९ पासून सरकारी अधिकाऱ्यांनी फिरोजपूरच्या परिसरात कागदावरच एक नवीन गाव वसवून त्याची बोगस ग्रामपंचायत स्थापन केली. बोगस ग्रामपंचायतीला खऱ्या ग्रामपंचायतीपेक्षा अधिकचा निधी वितरीत करण्यात आला. या बोगस गावाने केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांमधून ४५ लाख रुपये लाटले. हे सर्व पैसे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा आरोप होत आहे.

अधिकाऱ्यांनी पैसे लाटण्यासाठी नवी गुट्टी नावाने बोगस ग्रामपंचायत बनवली होती. त्यात ५५ योजनाही सुरू करण्यात आल्या. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा समावेश होता. या योजनेतून ४५ लाख रुपये हडप करण्यात आले. तर दुसरीकडे नवी गट्टी नावाची खरोखरची ग्रामपंचायत होती तिथे केवळ ३५ योजना सुरू केल्या होत्या. खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे. 

दरम्यान, हे प्रकरण उघड होताच अकाली दलाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. जर सरकारकडे ठोस पुरावे असतील तर दोषींवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अकाली दलाचे प्रवक्ते दलजीत चीमा यांनी केली आहे. या प्रकरणी तपास सुरू असून जे कुणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं ADC अधिकारी लखविंदर सिंह रंधावा यांनी म्हटलं. 

टॅग्स :fraudधोकेबाजी