शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बापरे! ३१२२ कोटींचं सोनं गेल्या पाच वर्षात भारतीय विमानतळांवरून केलं जप्त 

By पूनम अपराज | Updated: October 28, 2020 17:09 IST

Gold Smuggling : उदारीकरण होईपर्यंत भारतात सोन्याची तस्करी सर्रास होत होती, सोन्याचे दागदागिने वगळता सोन्याच्या आयातीवर बंदी घातल्यास वापरला जाणारा गोल्ड कंट्रोल कायदा 1968 रद्द केला गेला.

ठळक मुद्देपेट्रोलियम आणि सोने हे भारताच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट हे मुख्य कारक आहेत. तस्कर सोन्याच्या खरेदीसाठी परकीय चलन वापरतात आणि रुपयाचे मूल्य कमी करतात.अर्थ मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, केरळमधील चार आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी तीन (कोझिकोड, कोची आणि तिरुअनंतपुरम) तस्करी केलेल्या जास्तीत जास्त सोन्याची जप्त करण्यात आलेल्या १० विमानतळांच्या यादीत आहेत.

भारत हा एक समाज आहे ज्याने सोन्याकडे, मालमत्ता म्हणून आणि प्राचीन काळापासून दागिन्यांच्या रूपात बरेच महत्त्व दिले. इतिहास काळापासून भारत सोन्याची निव्वळ आयातकर्ता आहे. भारतीयांना अजूनही सोन्याबद्दल हे आकर्षण आहे. सर्व देशभर कोविड - १९ या महामारीमुळे बिघडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्यायाचा शोध घेतल्यामुळे सोन्याच्या किंमती नव्या विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचल्या. आजच्या घडीला सोने ही एक महत्वाची मालमत्ता आहे. सोन्याचा लक्झरी म्हणून वापर होतो तसेच गुंतवणूक पण होते. सोने खरेदी करण्याचे बरेच मार्ग आहेत. गुंतवणूकीची विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भिन्न उत्पादने वापरली जाऊ शकतात. उदारीकरण होईपर्यंत भारतात सोन्याची तस्करी सर्रास होत होती, सोन्याचे दागदागिने वगळता सोन्याच्या आयातीवर बंदी घातल्यास वापरला जाणारा गोल्ड कंट्रोल कायदा 1968 रद्द केला गेला. मागणी आणि पुरवठा यांच्यातील प्रचंड तफावत हा सोनं तस्करीच्या वाढत्या कारवायांमागील प्रमुख कारण आणि दुवा बनला. जास्त आयात शुल्क, भ्रष्टाचार आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे तस्करी होते. भारतात या सर्व बाबी तस्करीसाठी जबाबदार आहेत.रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाई व्ही रेड्डी यांनी एकदा नमूद केले होते की, भारतात ८० टक्के सोनीचा वापर दागदागिन्यांसाठी होत आहे. तर केवळ १५ टक्के गुंतवणूक आणि ५ टक्के  औद्योगिक उपयोगात सोनं वापरलं जात आहेत. अशा प्रकारे, सोन्यात गुंतवणूक करणं फारचं फायदेशीर नाही. त्यातील मॅक्रो आर्थिक बाजू आणखी हानिकारक आहे. सोन्याची आयात जितकी जास्त तितकी तूट जास्त. पेट्रोलियम आणि सोने हे भारताच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट हे मुख्य कारक आहेत. तस्कर सोन्याच्या खरेदीसाठी परकीय चलन वापरतात आणि रुपयाचे मूल्य कमी करतात.

 

गेल्या पाच वर्षात आणि चालू वर्षात केरळ विमानतळांसह देशातील विविध विमानतळांमधून सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

केरळ सोनं तस्करी प्रकरण ह्या वर्षी जुलै महिन्यात वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास ३० किलो सोन्याची तस्करी करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम विमानतळावरुन हे सोनं जप्त करण्यात आलं. हे सोनं संयुक्त अरब अमिरातीमधील दुतावासात पाठवलं जात होतं. कोणत्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्यात आली याचा तपास करायचा असल्याने आरोपींना कोठडीत ठेवणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला. एनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक असणाऱ्या रमीज याने चौकशीदरम्यान आपला टंझानियामध्ये हिऱ्यांचा व्यवयास असून तेथून सोनं आणलं होतं आणि युएईमध्ये विकलं असा दावा केला आहे. कस्टम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि 16 जणांना अटक केली.आरोपींनी तस्करी प्रकरणी बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) कारवाई करण्याला विरोध केला असून हे आर्थिक गुन्ह्यात येत असून दहशतवादाचा याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. एनआयएने हा दावा फेटाळत काही आरोपींची देशविरोधी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं आहे. एनआयएने कोर्टात माहिती दिली की, आरोपी क्रमांक ५ के टी रमीस आणि आरोपी क्रमांक १३ एम शरफुद्दीन अनेकदा टंझानियाला गेले असून दाऊदचा व्यवहार पाहणाऱ्या फिरोजला भेटले आहेत.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केरळशी संबंधित दोन सोन्याच्या तस्करी प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा (फेमा),१९९९ च्या तरतुदींनुसार संपूर्ण भारतभरातील पाच प्रकरणांमध्ये ईडीने चौकशीही केली. मुख्य आरोपींपैकी एक मुख्य आरोपी असल्याचे कोर्टात कळविण्यात आले. तथापि, निष्पक्ष आणि योग्य तपासणीसाठी शासन प्रभावी पाऊले उचलत आहे.26 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणात गुंतलेल्या फरारी राबीन्स के. हमीद याला अटक केली. दुबईहून आल्यानंतर त्याला कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली.

 चेन्नई विमानतळावर सोनं जप्त10 ऑक्टोबर 2020 रोजी चेन्नई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून 1.32 कोटी रुपये किमतीचे 2.88 किलोग्रॅम सोने जप्त केले आणि त्यांना अटक केली. दुबईहून सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे कस्टमने म्हटले आहे की, चेन्नईत आलेल्या तीन प्रवाशांची चौकशी करून त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या गुदाशयात लपविलेले सोन्याचे पेस्ट बंडल असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या गुदद्वारातून सोन्याचे पेस्टचे बारा बंडल (प्रत्येकी चार) जप्त केले. काढल्यानंतर एकूण २.७७ किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या पॅंटच्या खिशातून (प्रत्येकी एक) ११६ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे बिट्स सापडले.

भारतीय विमानतळांवर पाच वर्षांत ३१२२ कोटी रुपयांचे ११,००० किलोहून अधिक सोने जप्त केलेकेरळ विमानतळांसह देशातील विविध विमानतळांमार्फत सोन्याची तस्करी वाढत असल्याने देशाच्या आर्थिक स्थिरतेवर विपरित परिणाम झाला असल्याचे शासन / अंमलबजावणी संचालनालय / कस्टमच्या लक्षात आले असल्याचं वित्त मंत्रालयाने अलीकडेच म्हटले आहे.मागील वर्षांच्या तुलनेत २०१९ - २०२०मध्ये सोन्याची तस्करी किरकोळ प्रमाणात घसरल्यामुळेही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोझिकोड आणि कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर जास्तीत जास्त तस्करी झालेल्या सोन्याच्या जप्तीची नोंद झाली. मात्र, असे दिसून येते की, विमानतळावर सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्या तुलनेत बंदरात तस्करी कमी आढळते. अर्थ मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, केरळमधील चार आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी तीन (कोझिकोड, कोची आणि तिरुअनंतपुरम) तस्करी केलेल्या जास्तीत जास्त सोन्याची जप्त करण्यात आलेल्या १० विमानतळांच्या यादीत आहेत.

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करीAirportविमानतळIndiaभारतNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाKeralaकेरळ