शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बाबो! कारमधून नेत होते चक्क सोन्याची होडी; तस्करीचा फंडा पाहून पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:59 IST

पोलिसांनी ५ तरुणांना ठोकल्या बेड्या; अधिक तपास सुरू

प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सोने तस्करीची एक वेगळीच घटना समोर आली आहे. नाकाबंदी सुरू असताना उघडकीस आलेल्या या घटनेनं पोलीस चक्रावून गेले. काही व्यक्ती कारमधून चक्क सोन्याची होडी घेऊन प्रवास करत होते. या होडीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तस्करांना पकडण्यासाठी नाकाबंदी लावली. त्यात ५ जण अलगद सापडले. पोलिसांनी पकडलेली होडी जवळपास दीड किलोची आहे.

काही व्यक्ती कारमधून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मनोरी पासवर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका कारमध्ये पोलिसांना सोन्याची होडी दिसली. या प्रकरणी पोलिसांनी प्रयागराज आणि कौशांबीतील ५ तरुणांना अटक केली. तिलक सिंह (कौशांबी), सूरज वर्मा (प्रयागराज), धीरेंद्र पाल (कौशांबी), विमलेश कुमार (कौशांबी) आणि रामधन (प्रयागराज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

आसाममधून आणलेलं सोनं विकायला जात असल्याची माहिती आरोपींनी पोलीस चौकशीत दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे सोने खरेदीशी संबंधित कागदपत्रं मागितली. मात्र त्यांना कोणतीही कागदपत्रं दाखवता आली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी होडी ताब्यात घेतली आणि ५ जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला अहवाल पाठवला आहे. 

टॅग्स :Goldसोनं