शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

काही न सांगता सोडून गेला प्रियकर, त्याच्या शोधात मुंबईहून जौनपूरला पोहचली तरूणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 18:32 IST

काही दिवसांपूर्वी तरूण काही न सांगता तो तिला सोडून मुंबईहून गावाला पळून आला. आता प्रेयसीच्या त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचली आहे.

यूपीच्या जौनपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक तरूणी तिच्या प्रियकराच्या शोधात साधारण दीड हजार किलोमीटरचं अंतर पार करून मुंबईहून बदलापूरला आली आहे. येथील पोलीस स्टेशन परिसरात येऊन तरूणीने तिच्या प्रियकराला बोलण्याचा हट्ट धरला आहे. तरूणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तरूणाने तिच्यासोबत लग्न केलं आहे. तेच काही दिवसांपूर्वी तरूण काही न सांगता तिला सोडून मुंबईहून गावाला पळून आला. आता प्रेयसीच्या त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचली आहे.

कुठली आहे प्रेयसी?

तरूणीने सांगितलं की, ती बिहारच्या सीतामढी गावातील राहणारी आहे. तिचं नाव ममता गुप्ता आहे. ममताने आरोप लावला आहे की, ती मुंबईच्या गोरेगाव वेस्ट मध्ये राहत होती. तेथील एका स्टुडिओमध्ये गाणं गात होती. यादरम्यान बदलापूरच्या छिटकापूर गावातील विशाल कुमार यादवसोबत त्याची भेट झाली. हळूहळू दोघे प्रेमात पडले. काही दिवसांनंतर दोघांनी तेथील मंदिरात लग्नही केलं आणि सोबत राहू लागले. लग्नाला तीन वर्ष झाले. तेव्हा ममता विशालसोबत कोर्ट मॅरेजचा हट्ट करू लागली होती. अशात १२ ऑक्टोबरला विशाल ममताला मुंबईमधेच सोडून गावी पळून आला.

प्रियकराच्या मागे प्रेयसी

ममताला जेव्हा प्रियकर पळून गेल्याची खबर लागली तेव्हा ती सुद्धा रविवारी सायंकाळी बदलापूरला पोहोचली. तिथे तिने  पोलिसांना सगळं सांगितलं. तेव्हा ती तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्याचा हट्ट करत आहे. २४ तास उलटून गेले तरी प्रियकर आला नाही, पण तरी ती हट्ट सोडायला तयार नाही.

प्रेयसीने सांगितलं की, मी कोर्ट मॅरेजसाठी विशालवर दबाव टाकत होती. पण तो नेहमीच दुर्लक्ष करत होता. पैसे नसल्याचं कारण देत होता. ज्यावर मी विश्वास ठेवत राहिले. पण एक दिवस बाहेर जातो सांगत गेला आणि तेव्हापासून गायब झाला. मी याची माहिती मुंबई पोलिसांनाही दिली. पोलीस म्हणाले की, जेथील प्रकरण आहे तिथे जा. त्यामुळे मी इथे येऊन सूचना दिली. पण इथेही माझं कुणी ऐकत नाहीये. तेच पोलीस इथे २४ तास होऊनही मीडियासमोर येण्यास टाळाटाळ करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी