शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

आईवरून शिवी दिल्याने मित्राची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 16:49 IST

 रिक्षात पुढे बसण्यावरून सुरु झाला वाद

ठळक मुद्देकंदुरीसाठी निघाले होते रवनापराड्याला

औरंगाबाद :  रिक्षात पुढे बसण्यावरून झालेल्या वादानंतर मृताने आरोपीला आईवरून दिलेली शिवी जिव्हारी लागल्याने त्याने चाकूने भोसकून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. कटकटगेट रोडवरील पोलीस अधिकारी मेसजवळ (आयपी मेस) बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, शेख रेहान शेख पाशू याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहरकर यांनी एक सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

शेख आसिफ शेख खलिक (२५, रा. एस. टी. कॉलनी, फाजलपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेख रेहान शेख पाशू (रा. लेबर कॉलनी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना जिन्सी आणि सिडको पोलिसांनी सांगितले की, अंबड तालुक्यातील रवना पराडा येथे कं दुरीच्या कार्यक्रमास जाण्यासाठी एस. टी. कॉलनी फाजलपुरा, लेबर कॉलनी येथील शेख रेहान, सोहेल, इब्राहिम, रिक्षाचालक शेख वसीम आणि शेख आसिफ यांनी बेत आखला होता. वसीमच्या मित्राच्या कंदुरीचा कार्यक्रम असल्याने त्याच्या रिक्षात केवळ सर्वांनी मिळून पेट्रोल टाकायचे ठरले होते. त्यानुसार सर्वांनी प्रत्येकी शंभर रुपये जमा केले आणि ते कटकटगेटमार्गे जात असताना रिक्षात समोरील सीटवर कोणी बसावे, यावरून मृत आसिफ आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला. पुढे पेट्रोलपंपावर त्यांनी रिक्षात पेट्रोल टाकले. तेथे त्यांच्यातील वाद अधिक पेटला. तेथून पुढे जात असताना आसिफने रेहानला आईवरून शिवी दिली. ही शिवी रेहानच्या जिव्हारी लागली आणि त्याने रिक्षा थांबवायला लावली. आसिफला रिक्षातून ओढत नेऊन त्याच्यावर चाकूने वार केले. यात तो जागीच ठार झाला. आसिफ बेशुद्ध झाल्यानंतर रेहानने आणि वसीम यांनी त्याला रिक्षातून घाटीत दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी आसिफचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आपल्या हातून खून झाल्याचे कळताच रेहान रडू लागला.

कंदुरीसाठी निघाले होते रवनापराड्यालाप्रत्येकी  शंभर रुपये जमा करून पाच जणांनी रिक्षामध्ये पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकले आणि ते कंदुरी जेवणासाठी अंबड तालुक्यात जात होते. मात्र, रिक्षाच्या मागील सीटवर कोणी बसावे, यावरून दोघांत झालेल्या वादात एकाने दुसऱ्याची भोसकून हत्या केली आणि कंदुरीचा कार्यक्रम अर्धवट राहिला.