शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खंडणीसाठी तरुणाची हत्या, चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:44 IST

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने दोन ते तीन तालुक्यात फिरवून त्यानंतर रात्री खून करून मृतदेह वाघदीच्या पाण्यात टाकण्यात आला. 

गोंदिया : खंडणीसाठी २० वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ मोरेश्वर कटारे (२०) रा. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्यानंतर सदर तरुणाने आरोपीला ओळखल्याने त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. त्यानंतर दुपारी २.३० वाजतापासून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा १२ तास तडफडून त्याचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने गोंदिया जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यात फिरवून त्यानंतर रात्री खून करून मृतदेह वाघदीच्या पाण्यात टाकण्यात आला. खंडणीसाठी मृत तरुणाचा नातेवाईक (आतेभाऊ) अंकित राधेशाम बिरनवार (२१) रा.कमरगाव गोरेगाव याने १५ डिसेंबरच्या दुपारी फोन करून सौरभला गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर बोलावले. त्यावेळी दुपारी २.३० वाजता दरम्यान सौरभ त्या ठिकाणी आला असता. आरोपींनी खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर बिअरच्या बॉटलच्या काचाने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर त्याला चारचाकी वाहनात टाकून त्याला गोंदियातून गोरेगाव तालुक्याच्या मांडोबाईपर्यंत नेले. खंडणी मागण्याचा उद्देश होता. अंकीत बिरनवार हा त्याच्या नात्यात असल्याने अपहरण करतांना सौरभने आपल्याला ओळखले त्यामुळे त्याचा खून करणे आवश्यक असल्याचे ठरवून अंकीतने इतर आरोपींच्या मदतीने त्याचा खून करण्याचा चंग बांधला. १५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता त्याच्या डोक्यावर काचेच्या बॉटलने मारून तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहीला. रात्री १२ वाजतापर्यंत त्यांनी त्याला तडफडत ठेवले. तरीही तो जिवंत असल्याचे पाहून कामठा जवळील एका गावातील पुलाखाली नेऊन त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याचा मृतदेह वाघनदीच्या पात्रात टाकण्यात आले. वाघनदीच्या पात्रात मृतदेह टाकतांना त्याच्या मृतदेहाला दगड बांधण्यात आले होते. यासंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३६३, ३६६, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अंकीत राधेश्याम बिरनवार (२१) रा. कमरगाव (गोरेगाव), राजू मारबते (२१) गजेंद्र मारबते (१९) व चित्तेश्वर बिसेन (२१) रा. बटाणा अश्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप घोंगे करीत आहेत.  आरोपी वाढण्याची शक्यताया खंडणी प्रकरणात सहकार्य करणाऱ्या आरोपींची संख्या अधिक आहे. पोलिसांनी सद्या चारच जणांना अटक केली आहे. परंतु त्याला सोडून देणारा, आरोपींना मदत करणारे लोक अद्याप अटक झाले नाहीत.यासंदर्भात सद्या पोलिसांनी तपासाच्या नावार अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु याप्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून