शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

लोकलच्या गर्दीतून १७ वर्षीय मुलीचं 'फिल्मी' स्टाईल अपहरण; २५० किमी दूर सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 11:13 IST

पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलाचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा त्याचे लोकेशन २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचे कळाले

ठाणे – मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रोज लाखोंच्या संख्येने लोकं प्रवास करतात.  अपवाद वगळता लोकल ट्रेनमधील गर्दी क्वचितच कमी दिसते. त्यात ठाण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकलच्या गर्दीतून एका १७ वर्षीय मुलीचं फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकाराचा तपास केला असता अपहरण करणारा अन्य कुणी नसून मुलीचा बॉयफ्रेंड असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला ही अल्पवयीन मुलगी बदलापूर ते विक्रोळी असा लोकल प्रवास करत होती. परंतु जेव्हा ती घरी पोहचली नाही तेव्हा कुटुंबाला चिंता लागली. मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होत नव्हता. मुलीचा फोन बंद होता. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत आई वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. मुलगी ट्रेनने एकटी प्रवास करत होती. परंतु ती घरी पोहचली नाही आणि तिच्याशी संपर्क होत नाही असं आई वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यासोबत १९ वर्षीय मुलावर मुलीला किडनॅप केले असावे असा आरोप केला.

पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलाचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा त्याचे लोकेशन २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचे कळाले. पोलिसांचे पथक साताऱ्याला पोहचले. तेव्हा एका घरातून मुलगा बाहेर पडताना त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या घरात पोलिसांनी पाहिले असता तिथे बेपत्ता मुलगी सापडली. पोलिसांनी या मुलाला अटक करून मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले.

या मुलीने सांगितले की, मुलाने मला फसवून त्याच्यासोबत इथं आणले. तर मुलाने मुलगी स्वत: हून माझ्यासोबत आली असा दावा केला. पोलिसांनी या दोघांच्या मित्रांची चौकशी केली तर मुलगा-मुलगी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कळाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी कल्याण जीआरपी इथं अपहरणाची तक्रार नोंदवली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी