शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

Corona Vaccination: 'आधी मला, आधी मला' करत कोरोना लसीसाठी एकमेकांशी भिडले; अनेकांची डोकी फुटली, १२ हून जास्त जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 12:22 IST

बिहारमध्ये लसीकरण केंद्रावर हिंसक घटना झाल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी झालेल्या गोंधळात अनेक लोकं जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदुसरीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वत:चा जीव मुठीत घालून पळून गेले. कोरोनाची लस पहिली कोण घेणार? यावरून दोन गटांमध्ये वाद झाला.हा वाद इतका टोकाला पोहचला की लसीकरण केंद्रावरच एकमेकांशी भिडले.

सीतामढी – देशात कोरोनाविरुद्ध लढाईत लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व आहे. जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेवर केंद्र सरकारने भर दिला आहे. निर्धारीत वेळेत सर्व लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु लसीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत.

बिहारमध्ये लसीकरण केंद्रावर हिंसक घटना झाल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी झालेल्या गोंधळात अनेक लोकं जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वत:चा जीव मुठीत घालून पळून गेले. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर दोन गटामध्ये हाणामारी झाली. कोरोनाची लस पहिली कोण घेणार? यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहचला की लसीकरण केंद्रावरच एकमेकांशी भिडले.

माहितीनुसार, भटोलिया गावातील शाळेत मंगळवारी कोरोना लसीवरून दोन गटात मारहाणीची घटना घडली. यात १२ पेक्षा अधिक लोक जखमी झाले. स्थानिक पोलिसांना याची माहिती समजताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सशस्त्र पोलीस दलही पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या प्रयत्नानंतर लसीकरण केंद्रावरील तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. गावात सध्या शांतता आहे मात्र पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहेत. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले. त्यात काही गंभीर असल्याचंही समोर आलं आहे.

या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिले मला, पहिले मला करत दोन गटात वाद सुरू झाला. त्यानंतर काही जणांनी हाणामारीला सुरुवात केली. ज्यात काही लोक जखमी झाले आहेत. स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. बखरी आणि भटोलिया गावात सशस्त्र पोलीस दल तैनात केले आहे. यापूर्वी देशातील काही भागात अशाप्रकारे घटना घडली होती. कोरोना लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत होते. त्यात प्रचंड गदारोळ झाला होता.

तीन महिन्यांनंतर नवे रुग्ण सर्वांत कमी

देशात १३२ दिवसांनंतर प्रथमच नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या खाली आली आहे, तर १२४ दिवसांनंतर उपचाराधीन रुग्ण चार लाखांच्या आत आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या ३,९८,१०० असून, एकूण रुग्णांच्या संख्येत हे प्रमाण १.२७ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के आहे.

देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण आढळले, तर ४१५ जणांचा मृत्यू झाला. देशात आता एकूण मृतांची संख्या ४,२१,३८२ झाली आहे.२४ तासांत नव्या रुग्णांची संख्या १३,०८९ ने कमी झाली, तर एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूदर हा १.३४ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४४.१९ कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ३,१४,४०,९५१ रुग्ण आहेत. सोमवारी १७,२०,११० कोविड चाचण्या घेतल्या गेल्या व या बरोबर आतापर्यंत ४५,९१,६४,१२१ चाचण्या केल्या गेल्या. रुग्ण सकारात्मक निघण्याचा दैनिक दर १.७३ टक्के तर साप्ताहिक दर २.३३ टक्के आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या