शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 22:03 IST

कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी एक ट्विट केले होते. त्यावर कंगनाने उत्तर देत बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. यावरून कंगना ट्रोल होत आहे. 

कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. यावर कंगनाने मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असे उत्तर दिले आहे. महत्वाचे म्हणजे राम कदम यांनी याचे समर्थनही केले आहे. 

मात्र तिच्या या वादग्रस्त ट्विटवर नेटकऱ्यानी खरपूस समाचार घेतला आहे. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत तिचा निषेध केला आहे.

कंगनाने शनिवारी रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीसोबत चर्चा केली. यावेळी रिया ही एक प्यादे आहे. तिला सुशांतला पैशांसाठी वापरले असेल, फिल्म मिळविण्यासाठी किंवा त्याला ड्रग देण्यासाठी. पण रियाच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे, आपल्याला जाणून घ्यायला हवा, असे कंगना म्हणाली. रियाने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केले किंवा हत्या केली याबाबत तुरुंगवास झाला हो वेगळा मुद्दा आहे. पण तिला हे सारे करण्यासाठी कोणी उद्यूक्त केले किंवा त्याचा उद्देश काय होता? सुशांतकडून त्याला काय हवे होते? सुशांतला त्याच्याबद्दल काही माहिती होते का? सुशांतला का मारले गेले आदी प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत असे कंगना म्हणाली.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMumbai policeमुंबई पोलीसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत