शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बलात्कारप्रकरणी वडिलांना जामीन मंजूर; आरोप खोटा असल्याची शक्यता : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:15 IST

दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली. 

मुंबई : पालकांच्या वादात मुलीने आईच्या सांगण्यावरून वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप केला असण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीची जामिनावर सुटका केली. दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली. 

  पीडितेची आई व अर्जदार यांच्यातील गंभीर वादाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्रकरणात (मुलीवर लैंगिक अत्याचार) अर्जदाराला नाहक अडकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जदाराने आधीच एक वर्ष कारावास भोगला आहे. त्याच्यावर आरोप निश्चितीही करण्यात आलेली नाही. ४ डिसेंबर २०२३ रोजी त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची अर्जदाराची याचिका आम्ही मंजूर करत आहे, असेही न्या.पितळे यांनी म्हटले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचे पालक वेगळे राहतात. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुलगी वडिलांकडे राहायला गेली.१३ ऑक्टोबर रोजी ती तिच्या बहिणीला शाळेत सोडून घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार  केला. त्याबाबत तिने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी लगेचच आरोपीला अटक केली.

पीडितेने ११ दिवसांनंतर पोलिसांकडे तक्रार केली. तेही आई भेटल्यानंतर तिने गुन्हा  दाखल केला. सुरुवातीला तिने वडिलांनी १३ ऑक्टोबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. तर तिच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिने कोरोनापासून वडील आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने वडिलांचे घर सोडले आणि आईकडे राहायला गेली. 

पुन्हा तेथेच का गेली ?वडिलांनी अत्याचार केला तरी मुलगी पुन्हा वडिलांकडे राहायला का गेली? अशी शंका न्यायालयाने उपस्थित केली.  मुलीमध्ये आणि आईमध्ये मतभेद झाल्यानंतर मुलगी वडिलांकडे राहायला गेली, मुलीवर वडिलांनीच लैंगिक अत्याचार केला असता तर आईने पुन्हा मुलीला वडिलांकडे राहायला का पाठवले असते? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस