शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बेपत्ता मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाठवलं होतं तुरूंगात, ३ वर्षाने जिवंत मुलगी परतली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:59 IST

Uttar Pradesh Crime News : मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) फर्रुखाबाद पोलीस स्टेशनचा एक अजब कारनामा समोर आलाय. ज्यात आपल्याच मुलीच्या हत्येप्रकरणी एक वडील तीन वर्षांपासून तुरूंगात शिक्षा भोगत होता. पोलिसांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली नाही. वयोवृद्ध वडील तुरूंगात बंद असल्याची बातमी कथित मृत मुलीला मिळाली तर ती पोलीस अधिक्षकांसमोर पोहोचली. यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  कोर्टाने मुलीच्या वडिलाला सोडलं आणि खऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती. चिंतेत असलेल्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत सांगितलं की, मुलगी घरी परतली नाही. अनेक दिवस वडिलांनी पोलिसांकडे मुलीला शोधण्याची मागणी केली.  पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर पोलीस मुलीचा शोध घेऊ शकले नाही तर त्यांनी मुलीच्या वडिलांना तुरूंगात डांबलं.

पीडित वडिलांनी ओंकार अजब सिंह, बिशनदयाल, संतोष आणि संतोष देवी यांच्यावर संशय व्यक्त करत २०१६ मध्ये तक्रार दिली होती. पण पोलिसांनी उलट वडिलांनाच जबरदस्ती आरोपी बनवत मुलीच्या हत्ये प्रकरणी तुरूंगात टाकलं. हे प्रकरण त्यावेळी इन्स्पेक्टर सुनील कुमार  आणि एसआय मोहम्मद आसिफ यांनी हाताळलं होतं. त्यांनी तथ्य न बघता सोनीची हत्या झाल्याचं सांगितलं. तर लालारामने तिला मारलं. 

लालारामला निर्दोष असूनही आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी ३ वर्ष तुरूंगात रहावं लागलं. नंतर जेव्हा मुलीला याबाबत समजलं की वडील तुरूंगात आहे तर ती पोलिसांसमोर आली. तिने पोलिसांना ती जिवंत असल्याचं सांगत आपल्या मर्जीने घर सोडून गेल्याचं सांगितलं. तसेच मुलीने वडिलांना सोडण्यास सांगितलं. तिने पोलिसांसमोर सिद्ध केलं की, ती मृत नाही तर जिवंत आहे. ती तिच्या मर्जीने घर सोडून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांना सोडून देण्यात आलं.

सांगण्यात आलं की, २६ मे २०२० रोजी सोनीने एसपीसमोर प्रमाणपत्र आणि शपथ पत्र सादर करून ती जिवंत असल्याचं सिद्ध केलं. तर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावत सांगितलं की, पोलिसांनी त्याला मारहाण करत जबरदस्ती मुलीच्या हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी