शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेपत्ता मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाठवलं होतं तुरूंगात, ३ वर्षाने जिवंत मुलगी परतली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:59 IST

Uttar Pradesh Crime News : मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) फर्रुखाबाद पोलीस स्टेशनचा एक अजब कारनामा समोर आलाय. ज्यात आपल्याच मुलीच्या हत्येप्रकरणी एक वडील तीन वर्षांपासून तुरूंगात शिक्षा भोगत होता. पोलिसांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली नाही. वयोवृद्ध वडील तुरूंगात बंद असल्याची बातमी कथित मृत मुलीला मिळाली तर ती पोलीस अधिक्षकांसमोर पोहोचली. यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  कोर्टाने मुलीच्या वडिलाला सोडलं आणि खऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती. चिंतेत असलेल्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत सांगितलं की, मुलगी घरी परतली नाही. अनेक दिवस वडिलांनी पोलिसांकडे मुलीला शोधण्याची मागणी केली.  पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर पोलीस मुलीचा शोध घेऊ शकले नाही तर त्यांनी मुलीच्या वडिलांना तुरूंगात डांबलं.

पीडित वडिलांनी ओंकार अजब सिंह, बिशनदयाल, संतोष आणि संतोष देवी यांच्यावर संशय व्यक्त करत २०१६ मध्ये तक्रार दिली होती. पण पोलिसांनी उलट वडिलांनाच जबरदस्ती आरोपी बनवत मुलीच्या हत्ये प्रकरणी तुरूंगात टाकलं. हे प्रकरण त्यावेळी इन्स्पेक्टर सुनील कुमार  आणि एसआय मोहम्मद आसिफ यांनी हाताळलं होतं. त्यांनी तथ्य न बघता सोनीची हत्या झाल्याचं सांगितलं. तर लालारामने तिला मारलं. 

लालारामला निर्दोष असूनही आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी ३ वर्ष तुरूंगात रहावं लागलं. नंतर जेव्हा मुलीला याबाबत समजलं की वडील तुरूंगात आहे तर ती पोलिसांसमोर आली. तिने पोलिसांना ती जिवंत असल्याचं सांगत आपल्या मर्जीने घर सोडून गेल्याचं सांगितलं. तसेच मुलीने वडिलांना सोडण्यास सांगितलं. तिने पोलिसांसमोर सिद्ध केलं की, ती मृत नाही तर जिवंत आहे. ती तिच्या मर्जीने घर सोडून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांना सोडून देण्यात आलं.

सांगण्यात आलं की, २६ मे २०२० रोजी सोनीने एसपीसमोर प्रमाणपत्र आणि शपथ पत्र सादर करून ती जिवंत असल्याचं सिद्ध केलं. तर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावत सांगितलं की, पोलिसांनी त्याला मारहाण करत जबरदस्ती मुलीच्या हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी