शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

बेपत्ता मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाठवलं होतं तुरूंगात, ३ वर्षाने जिवंत मुलगी परतली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:59 IST

Uttar Pradesh Crime News : मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) फर्रुखाबाद पोलीस स्टेशनचा एक अजब कारनामा समोर आलाय. ज्यात आपल्याच मुलीच्या हत्येप्रकरणी एक वडील तीन वर्षांपासून तुरूंगात शिक्षा भोगत होता. पोलिसांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली नाही. वयोवृद्ध वडील तुरूंगात बंद असल्याची बातमी कथित मृत मुलीला मिळाली तर ती पोलीस अधिक्षकांसमोर पोहोचली. यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  कोर्टाने मुलीच्या वडिलाला सोडलं आणि खऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती. चिंतेत असलेल्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत सांगितलं की, मुलगी घरी परतली नाही. अनेक दिवस वडिलांनी पोलिसांकडे मुलीला शोधण्याची मागणी केली.  पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर पोलीस मुलीचा शोध घेऊ शकले नाही तर त्यांनी मुलीच्या वडिलांना तुरूंगात डांबलं.

पीडित वडिलांनी ओंकार अजब सिंह, बिशनदयाल, संतोष आणि संतोष देवी यांच्यावर संशय व्यक्त करत २०१६ मध्ये तक्रार दिली होती. पण पोलिसांनी उलट वडिलांनाच जबरदस्ती आरोपी बनवत मुलीच्या हत्ये प्रकरणी तुरूंगात टाकलं. हे प्रकरण त्यावेळी इन्स्पेक्टर सुनील कुमार  आणि एसआय मोहम्मद आसिफ यांनी हाताळलं होतं. त्यांनी तथ्य न बघता सोनीची हत्या झाल्याचं सांगितलं. तर लालारामने तिला मारलं. 

लालारामला निर्दोष असूनही आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी ३ वर्ष तुरूंगात रहावं लागलं. नंतर जेव्हा मुलीला याबाबत समजलं की वडील तुरूंगात आहे तर ती पोलिसांसमोर आली. तिने पोलिसांना ती जिवंत असल्याचं सांगत आपल्या मर्जीने घर सोडून गेल्याचं सांगितलं. तसेच मुलीने वडिलांना सोडण्यास सांगितलं. तिने पोलिसांसमोर सिद्ध केलं की, ती मृत नाही तर जिवंत आहे. ती तिच्या मर्जीने घर सोडून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांना सोडून देण्यात आलं.

सांगण्यात आलं की, २६ मे २०२० रोजी सोनीने एसपीसमोर प्रमाणपत्र आणि शपथ पत्र सादर करून ती जिवंत असल्याचं सिद्ध केलं. तर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावत सांगितलं की, पोलिसांनी त्याला मारहाण करत जबरदस्ती मुलीच्या हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी