शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रात्रीचं जेवण केल्यावर बेशुद्ध झाला परिवार, 2 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 09:38 IST

शुक्रवारी सकाळी बराच वेळ होऊनही कुणी बाहेर आलं नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर परिवारातील 5 लोक बेशुद्ध पडलेले होते.

उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विवाहित महिलेने रात्री जेवणात नशेचा पदार्थ टाकला. नंतर हे जेवण पती, सासू आणि सासऱ्यांना खाऊ घातलं. ज्यामुळे ते सगळेच बेशुद्ध झाले. यानंतर महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. इतकंच नाही तर महिला दागिने आणि पैसेही घेऊन गेली. 

शुक्रवारी सकाळी बराच वेळ होऊनही कुणी बाहेर आलं नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर परिवारातील 5 लोक बेशुद्ध पडलेले होते. त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना गुलाब टांडा गावातील आहे. इथे सुशील कुमार आपल्या परिवारासोबत राहतो. सुशीलने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितलं की, 6 एप्रिलच्या सायंकाळी घरातील सगळ्यांनी जेवण केलं, ज्यानंतर सगळेच बेशुद्ध झाले. जेवण त्याच्या पत्नीनेच तयार केलं होतं. तिनेच त्यात नशेचा पदार्थ टाकला होता.

जेवणानंतर परिवारातील सगळे लोक बेशुद्ध झाल्यावर त्याची पत्न 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. सुशीलने सांगितलं की, त्याला आधीपासूनच आपल्या पत्नीवर संशय होता की, तिचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. यावरून घरात अनेकदा वादही झाला आहे.सुशीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून त्यांचा शोध घेणं सुरू केलं आहे. जेव्हा घराची झडती घेण्यात आली तेव्हा समजलं की, महिला तिच्यासोबत दागिने आणि घरातील पैसेही घेऊन गेली आहे. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी