शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

मृत पोलिसांच्या कुटंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही; हेमंत नगराळे यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 18:27 IST

State DG Hemant Nagrale given assuarance : ३ दिवसांत १८३ पाल्यांना नोकरी

ठळक मुद्देकोरोनाचे पुन्हा आव्हान ठाकले आहे. गेल्या वर्षी राज्यात ३३९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचे जे नुकसान झाले ते कधीच भरून काढले जाऊ शकत नाही.राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या पोलिसांना कर्तव्यकठोर धोरण राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

नागपूर - कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या ज्या पोलिसांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवघे पोलीस दलच मृत पोलिसांच्या परिवाराच्या पाठीमागे आहे. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस दलात सहभागी करून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन दिवसांत मुंबई, कोकण, ठाणे आणि नागपूर मध्ये १८३ जणांना नियुक्ती देण्यात आली, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत नगराळे यांनी आज येथे पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हजर होते.

 नागपूर शहर आणि परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नगराळे बुधवारी रात्री नागपुरात आले. गुरुवारी सकाळी त्यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहर पोलीस दलाला येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 कोरोनाचे पुन्हा आव्हान ठाकले आहे. गेल्या वर्षी राज्यात ३३९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचे जे नुकसान झाले ते कधीच भरून काढले जाऊ शकत नाही. मात्र, त्यांना शक्य होईल ती मदत केली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस दलात अनुकंपा तत्वावर तातडीने सामावून घेण्याचे धोरण राबविले जात आहे.  या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन दिवसांत मुंबई आणि कोकण भागात ८३, ठाण्यात ७० आणि नागपुरात ३० जणांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आता पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून मुंबईत सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शिफ्टमध्ये पोलिसांना कर्तव्यावर बोलविले जात आहे. हा निर्णय पोलीस महासंचालनालय, मुंबई पर्यंत मर्यादित आहे. ईतर ठिकाणी त्या - त्या ठिकाणचे आयुक्त आणि अधीक्षक सोयीनुसार निर्णय घेणार असल्याचेही नगराळे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या पोलिसांना कर्तव्यकठोर धोरण राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मकोका, एमपीडीए, तडीपारीसारखे जास्तीत जास्त निर्णय घेऊन सराईत गुंडांना कारागृहात डांबले जात आहे. अनेक योजना अंमलात आणल्या जात असून त्याचे परिणाम राज्यात लवकर बघायला मिळतील, असे ते म्हणाले. नागपुरात मध्यंतरी हत्येचे गुन्हे वाढले होते. आता अधिक कठोेर कारवाई केली जात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे नगराळे म्हणाले. राज्यातील पोलीस दलाच्या अडचणीसंदर्भात प्रश्न केला असता त्यांनी राज्यात २० हजार पदे रिक्त असल्याचे सांगून वेलफेअर संबंधाने बरेच काही करायचे आहे, असे मत मांडले. पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाला असता त्यावर त्यांनी आपले परखड मत मांडले. भ्रष्टाचाराचे समर्थन नाहीच. मात्र, भ्रष्टाचार हा यंत्रणेचा भाग बनल्याचे कटू वास्तव आहे. तो संपवण्यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येकानेच ती किड नष्ट करण्यासाठी पुढे येण्याची गरज डीजीपींनी विशद केली.  पूजा चव्हाण प्रकरणात दबाव नाहीकोणत्याच प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यावर भाष्य करणे योग्य नाही. त्याने तपास प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाच्या संबंधाने आपण तूर्त काही बोलणार नाही. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून आणि योग्य पद्धतीने तपास करीत आहेत. चाैकशीत काय ते पुढे येईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणात राजकिय दबावाचा मुद्दा नगराळे यांनी फेटाळून लावला. नक्षलवाद, भीमा कोरेगाव आदी प्रश्नांवरही त्यांनी जास्त बोलण्याचे टाळले. 

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी