शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पैशांसाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, पाच तासांत गुन्ह्यांची केली उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:41 IST

कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला...

मुंबई : कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. काही तासांत मुलगा सुखरूप हवा असल्यास पाच लाखांच्या मागणीचा कॉल आला. या घटनेने खळबळ उडाली. बांगूर नगर पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके कामाला लावून तरुणाचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच गुन्ह्याची उकल करत तरुणाची सुटका करण्यास त्यांना यश आले. तपासात, वडिलांकडून पैसे काढण्यासाठी मुलानेच अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दहीसर परिसरात राहणारे तक्रारदार दिनेशलाल नारायण जोशी (४८) यांचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा जितेंद्र जोशी (२७) हा मंगळवारी रात्री गोरेगाव लिंकरोड येथून कामावरून घरी निघाला. मात्र बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. त्यानंतर, रात्री दोनच्या सुमारास जितेंद्र यांच्या पत्नीच्या मोबाइलवर व्हॉट्स ॲप कॉल आला. मुलाच्या सलामतीसाठी बुधवारी सायंकाळी ७ पर्यंत पाच लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व पोलिस व इतर कोणाला कळविल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

जोशी कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. वेगवेगळी तपास पथके तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुलाच्या मोबाइल लोकेशन तसेच त्याचा येण्याच्या जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० सीसीटीव्ही तपासले. अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे. 

असा रचला कट जितेंद्रकडे केलेल्या चौकशीत, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कामगाराला जितेंद्र जोशी यानेच ४ ते ५ दिवसांपूर्वी तो एका अडचणीत असल्याचे सांगितले. त्यातून सुटण्यासाठी त्याचे स्वतःचे अपहरण करून वडिलांकडून पैसे वसूल करण्याबाबत कट आखला.यामध्ये मदत न केल्यास त्याची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याने त्याने त्याला मदत करण्याचे ठरवले.ठरल्याप्रमाणे दि. ३१ मे रोजी जितेंद्र कामावरून सुटल्यानंतर त्याने मित्राकडून पत्नीला फोन लावून वडिलांकडून पाच लाख रुपये आणून देण्यास सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी