शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अविवाहित तरूणाची सर्वात मोठी फसवणूक; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:58 IST

जबलपूरच्या गोलबाजार परिसरात रजनीने मुलगी अंजली आणि तिचा भाऊ विकास तिवारी यांची भेट जयप्रकाशसोबत करून दिली.

ठळक मुद्देहे लग्न ठरलं जयप्रकाश आणि त्याचे नातेवाईक मुलीला घेऊन कोर्टात गेले. रजनीने जयप्रकाशकडून आधारकार्ड आणि ८ हजार घेऊन वकीलाला दिलेबनावट पोलिसांशी बोलून प्रकरण शांत केल्यानंतर जयप्रकाशनं पाहिलं की अंजली आणि तिचा भाऊ पळून गेले.

मध्य प्रदेशातील जबलपूर पोलिसांनी बनावट लग्न करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी अविवाहित युवकांचं खोटं खोटं लग्न लावून त्यांच्याकडून पैसे लुबाडून पसार होते. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसोबत तिघांना अटक केली आहे. ही टोळी चालवणारा म्होरक्या युवक आणि युवती फरार झाले आहेत. जे पती-पत्नी असून भाऊबहिण असल्याचं लोकांना सांगत होते. पोलीस आता या दोघांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

जबलपूरच्या लार्डगंज पोलीस ठाण्यात जयप्रकाश तिवारी यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत म्हटलंय की, माझं लग्न होत नव्हतं. ज्यामुळे त्याने नातेवाईकांकडे मुली शोधाव्या असं सांगितलं होतं. त्यानंतर जयप्रकाश तिवारी यांच्या एका नातेवाईकाने रजनी तिवारी नावाच्या एका महिलेचा नंबर दिला. त्या महिलेसोबत जयप्रकाशचं बोलणं झालं. जयप्रकाशच्या मोबाईलवर रजनीनं एका मुलीचा फोटो पाठवला. अंजली असं या तरूणीचं नाव होतं. जी जयप्रकाशला आवडली त्यानंतर मुलीला भेटण्यासाठी जयप्रकाश जबलपूरला गेला.

जबलपूरच्या गोलबाजार परिसरात रजनीने मुलगी अंजली आणि तिचा भाऊ विकास तिवारी यांची भेट जयप्रकाशसोबत करून दिली. त्यानंतर हे लग्न ठरलं जयप्रकाश आणि त्याचे नातेवाईक मुलीला घेऊन कोर्टात गेले. तिथे आधीच एक वकील त्यांची वाट पाहत होता. रजनीने जयप्रकाशकडून आधारकार्ड आणि ८ हजार घेऊन वकीलाला दिले. काही वेळानंतर वकीलाने जयप्रकाश आणि अंजली यांचं एका रजिस्टरवर सही घेतली आणि आता तुमचं लग्न झालं असून संसाराला लागा असं म्हटलं.

त्यानंतर सर्वजण गोलबाजारला परत आले. तिथे रजनीने जयप्रकाश आणि त्याच्या नातेवाईकांना मुलीसाठी कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी १ लाख १० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर रजनी तिथून निघून गेली. याचवेळी बाईकवर बसून ४ युवक त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी स्वत: पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही मुलीला घेऊन पळत आहात अशी धमकी देऊन त्यांच्याकडून ८५०० रुपये वसूल केले. बनावट पोलिसांशी बोलून प्रकरण शांत केल्यानंतर जयप्रकाशनं पाहिलं की अंजली आणि तिचा भाऊ पळून गेले. या घटनेनंतर जयप्रकाशला काहीच कळालं नाही. तो पुन्हा पन्ना येथे आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने लार्डगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी युवकांच्या बाईकच्या नंबरवरून आशिष तिवारी याला अटक केली.

पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने माहिती दिली की, विपील जैनने सुनील ठाकूर आणि ज्योती कुशवाहने रजनी तिवारी बनून एका पार्टीला पन्नाहून लग्न करण्यासाठी जबलपूरला बोलावलं. इथं भानू जैन हा विकास तिवारी आणि भानूची बायको सुमन जैन ही अंजली तिवारी म्हणून जयप्रकाशला भेटली. याचवेळी आशिषनं मित्रांसोबत मिळून बनावट पोलिसांचा रोल केला. धमकी देऊन जयप्रकाशला आणि त्याच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले. पोलिसांनी ज्योती कुशवाहा, सुनील ठाकूर, विपीन जैन, आशिष तिवारी यांना अटक केली आहे. अद्याप भानू आणि त्याची पत्नी सुमन फरार आहे. आरोपींकडून पोलिसांनी ५८ हजार रुपये जप्त केले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजीmarriageलग्न