शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगच्या तांदळाची आफ्रिकेत तस्करी; 380 मेट्रिक टन साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 19:36 IST

टोळीचा भांडाफोड ; महाराष्ट्रासह कर्नाटक मधील धान्य 

नवी मुंबई : लोकडाऊनच्या कालावधीत गरिबांना मोफत पुरवण्यासाठी असलेल्या शासकीय तांदुळाचा 380 मेट्रिक टन अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या विविध ठिकाणासह कर्नाटक मधून अपहार केलेल्या ता तांदुळाचा ठिकठिकाणी साठा करण्यात आला होता. या टोळीने निर्यातबंदी असतानाही अवैधरित्या शासकीय तांदुळाचा साठा करून आफ्रिकेला विकल्याचेही तपासात समोर आले आहे. 

 

पळस्पे येथे शासकीय वापराच्या धान्याचा अवैध साठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या पथकाने टेक केअर लॉजिस्टिक गोडाऊनवर छापा टाकला होता. त्याठिकाणी 110 मेट्रिक टन तांदूळ जप्त करण्यात आले होते. हे तांदूळ महाराष्ट्रासहकर्नाटक मधील शिधावाटप दुकानातला होता. लॉकडाऊन काळात गरजूंना मोफत पुरवठा करण्यासाठी शाशनाकडून हे धान्य पुरवण्यात आले होते. मात्र या टोळीने सदर धान्याचा अपहार करून ते त्याठिकाणी साठवले होते. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संजय कुमार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे, संदीपान शिंदे, विजय कादबाने, सहायक निरीक्षक पवन भिंगारदिवे, निलेश राजपूत, गणेश कराड, उपनिरीक्षक विक्रांत थारकर व सुनील तारमाळे यांचे पथक करण्यात आले होते. या पथकाने भिवंडी व खालापूर येथे छापे टाकून अधिक 270 मेट्रिक टन धान्य जप्त केलं. भिवंडी येथील भादाणे गावातील जय आनंद फूड कंपनी, खालापूर मधील झेनिथ इम्पॅक्ट कंपनी व जय फूड प्रोडक्ट्स याठिकाणी हा अवैध धान्यसाठा करण्यात आला होता. त्याठिकाणावरून जप्त केलेल्या एकूण शासकीय धान्याची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे. या गुन्हयात 18 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी तिघांना बुधवारी अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवनाथ राठोड (25), सत्तार सय्यद (25) व कृष्णा पवार (45) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नवनाथ व सत्तार हे कर्नाटकचे राहणारे असून कृष्णा हा विजापूरचा आहे. 

कर्नाटक व महाराष्टातील शिधावाटप दुकानांमधून अपहार करून साठवलेला हा शासकीय तांदूळ आफ्रिकेला पाठवला जात होता. विशेष म्हणजे निर्यात बंदी असतानाही त्यांनी आजवर माल पाठवला कसा असाही प्रश्न उदभवत आहे. 

या टोळीने जानेवारी ते अद्याप पर्यंत 32 हजार 827 मेट्रिक टन तांदूळ आफ्रिकेला निर्यात केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याकरिता वेगवेगळ्या राज्याचे शासकीय शिक्के वापरण्यात आले आहेत. यानुसार सदर टोळीविरोधात पनवेल शहर पोलिसठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या टोळीच्या मुळाशी पोचण्यासाठी परिमंडळ दोन व गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक