शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या, उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 19:14 IST

Suicide Case :उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा; ठाण्यातच पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या

किल्लारी (जि. लातूर) : किल्लारी पाेलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे २.१५ वाजता रायफलीने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. उसणे पैसे परत मिळत नसल्याच्या कारणावरुन हाेत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समाेर आले. ही बाब आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे उघडकीस आली आहे. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील रहिवासी साहेबराव सावंत (वय ३८) हे किल्लारी पाेलीस ठाण्यात पाेलीस नाईक म्हणून कार्यरत हाेते. दरम्यान, त्यांच्याकडून धनराज सूर्यवंशी (रा. हालसी ता. निलंगा) याने २०१७ मध्ये ९ लाख ५० हजार रुपये उसणे म्हणून घेतले हाेते. हे पैसे परत करा म्हणून सावंत यांनी सतत विचारणा केली. त्यांना पैसे न देता उलट शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली हाेती. शिवाय, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली हाेती. एवढी माेठी रक्कम परत मिळत नाही, उलट त्यातून त्रास हाेत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या साहेबराव सावंत यांनी ठाण्यातच रविवारी पहाटे २़१५ वाजता रायफीने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. गाेळीचा आवाज ऐकून पाेलीस नाईक कृष्णा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती पाे.नि. सुनिल गायकवाड यांना दिली. घटनास्थळाला पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पाेलीस अधिकारी मधुकर पवार, स्थागुशाचे पाे.नि. गजानन भातलवंडे यांनी भेट दिली.

छळणाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल...

याबाबत सुदाम संतराम सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किल्लारी पाेलीस ठाण्यात धनराज सूर्यवंशी, सलीम सय्यद, पाेलीस कर्मचारी बेग, काळे, मामडगे, चंदू पाटील, चंदू बरमदे, साेनू पाटील, राजू सूर्यवंशी, ईश्वर पाटील, गायकवाड यांच्या अन्य अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जणांना पाेलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित आराेपींना अटक केली जाणार आहे, असे पाेलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले.

सावंत यांना तीन मुली...

उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील मूळचे रहिवासी असलेल्या पाेलीस नाईक रावसाहेब सावंत यांची काही दिवसांपूर्वीच किल्लारी पाेलीस ठाण्यात बदली झाली हाेती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन लहान मुली असा परिवार आहे. उसण्या पैशाच्या कारणावरुन हाेत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने पाेलीस ठाण्यासमाेरच नातेवाईकांनी एकच आक्राेश केला.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसlaturलातूरDeathमृत्यू