शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"लग्न करायचं नव्हतं, शिक्षण्याची इच्छा होती पण...", कुटुंबीय ऐकले नाहीत म्हणून तिनं आयुष्य संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 11:29 IST

देशात 'बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान'च्या गोष्टी बोलल्या जातात. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा पुढे निघून गेल्याचं आपण म्हणतो.

इटावा

देशात 'बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान'च्या गोष्टी बोलल्या जातात. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा पुढे निघून गेल्याचं आपण म्हणतो. किंबहुना महिलांनी आपल्या कर्तृत्वातून ते सिद्ध देखील करुन दाखवलं आहे. पण सामाजिक परंपरांच्या आडून आजही मुलींच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. याचंच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये पाहायला मिळालं आहे. 

भरथाना कस्ब्यातील कांशीराम कॉलनीमधील १३२ क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय प्रियांका कक्षा इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी होती. तिला यंदा १२ वीचं शिक्षण घ्यायचं होतं. पण त्याआधीच तिनं आपलं जीवन संपवलं आहे. प्रियांकाला तिच्या आयुष्यात आधी स्वत:ला काहीतरी सिद्ध करुन दाखवायचं होतं. इतर मुलींप्रमाणे तिलाही उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण वाढत्या वयाचं कारण देत घरच्यांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. 

प्रियांकाच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केली होती. तिच्यासाठी वर देखील निश्चित करण्यात आला आणि मुलीनं वडिलांना आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. मला लग्न करायचं नाही, मला शिकायचं आहे असं प्रियांकानं वडिलांना सांगितलं. पण कुटुंबीयांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं. आपल्या बोलण्याला अजिबात महत्व दिलं जात नसून कुटुंबीय आपलं लग्न केल्याशिवाय थांबणार नाहीत असं प्रियांकाच्या लक्षात येताच तिनं टोकाचं पाऊल उचलायचं ठरवलं. आपल्या राहत्या घरात तिनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी प्रियांकाचे वडील प्रभू दयाल आणि त्यांची पत्नी काशीराम कॉलनीच्या १२३ व्या कॉर्टरच्या ग्राऊंड फ्लोअरवर होते. प्रियांकाला दोन लहान भाऊ आहेत आणि चार बहिणींमध्ये ती थोरली बहिण होती. वडील मोलमजुरी करुन घर चालवत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश