शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'डी-गँगमधून बोलतोय'; माजी नगराध्यक्षांना १० कोटींची खंडणी मागणारे दोघे जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:44 IST

वैजापूरच्या संचेती कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देपाच दिवसांनंतर छडा

वैजापूर : येथील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांना दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनीअटक केली. यातील एक जण शहरात मोबाईल शॉपी चालविणारा आहे, तर दुसरा वैजापूरजवळील रोटेगाव येथील रहिवासी आहे. या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मागील पाच दिवसांपासून संपूर्ण शहर पिंजून काढले. शेवटी अजय मोहनसिंग राजपूत (२६, रा.  परदेशीगल्ली, वैजापूर) व राजू ऊर्फ जयराम बागूल (३५, रा. रोटेगाव, ता. वैजापूर) या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा मर्चंटस् बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांना २६ नोव्हेंबर रोजी मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा एक कॉल आला. अज्ञात व्यक्तीने संचेती यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर तुमच्यासह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संचेती कुटुंबातील   सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. २७ नोव्हेंबर रोजी या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. 

मात्र, पोलिसांनी या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती. २८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी शहरातील परदेशी गल्लीतील अजय मोहनसिंग राजपूत व रोटेगाव येथील राजू बागूल या दोघांना  चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तब्बल तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. काल सोमवारी या दोघांनी पोलिसांसमोर तोंड उघडले. आपणच १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी संचेती परिवारास जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली अजय राजपूत याने दिली. याप्रकरणी अजय राजपूत व राजू बागूल या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना वैजापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

मास्टर माइंड अजय राजपूतच या प्रकरणात अजय राजपूत हाच मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. धमकी देण्यासाठी व खंडणी मागण्यासाठी राजेंद्र बागूलचा मोबाईल हॅण्डसेट वापरण्यात आला होता. अजय हा जुगार-मटक्यामध्ये २२ लाख रुपये हरल्यामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. हरलेल्या पैशाच्या भरपाईसाठी अजयने हा खंडणी उकळण्याचा कट रचला होता. 

सहा सीमकार्डांचा वापरस्टेशन रस्त्यावरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याशेजारी अजय राजपूत याची आर्यन मोबाईल शॉपी आहे. अजयला मोबाईलचे बरेच तंत्रज्ञान अवगत आहे. त्याने व्हॉईस चेंजरबरोबरच व्हॉटस्अ‍ॅपसारख्या सोशल साईटचाही वापर केला. पोलिसांना मोबाईलचे लोकेशन हे सतत परदेशी गल्लीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व लक्ष्मी चित्रपटगृहाजवळच मिळत होते. 

तत्पूर्वी झाला चतुर्भुज१२ डिसेंबर रोजी अजय हा विवाह बंधनात अडकणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला खंडणी मागणे व जिवे मारण्याची धमकी देणे, या प्रकरणात बेड्या ठोकल्या. पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणतीही पातळी गाठू शकतो, हे या खंडणी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. 

२७ नोव्हेंबरपर्यंतची मुदतअजयने २६ नोव्हेंबर रोजी संचेती यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून खंडणीची मागणी केली होती. त्याने संचेती यांना २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर संचेती यांच्या निवासस्थानी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त  होता. मोबाईलचे दुकान संचेती यांच्या आॅफिससमोरच असल्याने अजय व राजू हे दोघे जण बाळासाहेब संचेती यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे दोघे जण सतत पोलीस ठाण्यासमोर चकराही मारत असत. या प्रकरणात आरोपींना सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या घटनेचे वाईट वाटलेअनपेक्षितपणे मोबाईलवर खंडणी मागणारा फोन आला. त्यामुळे आमच्या कुटुंबावर भीतीची छाया पसरली. पोलिसांनी अथक परिश्रम घेत चार दिवसांतच आरोपीला गजाआड केले. वैजापुरात सर्व जाती-धर्माच्या लोकांसोबत आपले स्नेहाचे संबंध आहेत. आरोपींनी हा पवित्रा का उचलला, याचे वाईट वाटले. यापूर्वी त्यांच्यासोबत आपला कसलाही संबंध आला नव्हता. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.- बाळासाहेब संचेती

गुप्तता पाळल्याने आरोपींपर्यंत पोहोचता आलेवैजापूर येथील व्यावसायिकाला डी-गँगच्या नावाने कॉल करून खंडणी मागणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सायबर सेल आणि पारंपरिक तपासाची उत्तम सांगड घातल्याने हायप्रोफाईल गुन्ह्याचा उलगडा करण्यात आम्हाला यश आले. या प्रकरणाचा तपास करताना गुप्तता पाळण्यात आल्याने आरोपीपर्यंत पोहोचता आले. खंडणी मागण्यासाठी आरोपी राजपूतला चोरीचा मोबाईल देणाऱ्यालाही आरोपी करण्यात आले.  -मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

पोलिसांना कळवावेवैजापूरच्या व्यावसायिकाला दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणारे कॉल आले. यानंतर सर्वप्रथम तक्रारदार कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, वैजापूर पोलीस ठाणे आणि सायबर क्राईम सेल यांनी संयुक्त कारवाई करून आरोपींना पकडले. अशा प्रकारे खंडणीचे कॉल आल्यानंतर न घाबरता तात्काळ पोलिसांना कळवावे. -गणेश गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक