शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Mansukh Hiren Case: 'त्यांचा' अंदाज फक्त अर्ध्या तासानं चुकला; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:34 IST

mansukh hiren case: देवेंद्र फडणवीसांचे सचिन वाझेंसह शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि शिवसेनेच्या संबंधांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही केवळ प्यादी आहेत. त्यांचा राजकीय बॉस कोण, याचा शोध घेणं गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.“मी मुख्यमंत्री असतानाही सचिन वाझेंसाठी शिवसेनेने...”; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावाख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणात सचिन वाझेंना २००४ मध्ये निलंबित करण्यात आलं. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही वेळ त्यांनी शिवसेनेचं प्रवक्तेपददेखील सांभाळलं. २०१८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी वाझेंना सेवेत घेण्यासाठी फोन केला होता. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी माझी भेटदेखील घेतली होती. वाझेंना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. मात्र गंभीर आरोपांखाली निलंबन झाल्यानं मी त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? काँग्रेस नेत्याचा सवालमुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ४ महिने वाझेच वापरत होते. ही गाडी मनसुख हिरेन यांचीच होती. गाडी चोरीला गेल्याचा बनावदेखील वाझे यांनीच रचला. मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी असतानाही एपीआय दर्जाच्या वाझेंकडे स्फोटक प्रकरणाचा तपास सोपवला गेला. हिरेन यांची चौकशीदेखील त्यांनीच केली. पुढे याच हिरेन यांचा खून झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडून झालेला नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी आढळून आलेलं नाही. त्यांच्या तोंडाजवळ रुमाल आढळून आले. श्वास कोंडला गेल्यानं मनसुख यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला. मात्र मृतदेह पाण्यात टाकणाऱ्यांचा अंदाज अर्ध्या तासानं चुकला. त्यांनी भरतीऐवजी ओहोटी असताना मृतदेह टाकून दिला. तो वाळूत रुतून बसला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणShiv Senaशिवसेना