शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:49 IST

करावल नगरमध्ये भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एका कारखान्यातून दिलीप सिंह आणि खुर्शीद मलिक नावाचे दोन लोक सापडले. हे लोक भेसळयुक्त मसाले तयार करत होते.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने करावल नगरमध्ये अशा दोन कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे, जेथे सडलेला तांदूळ, लाकडाचा भुसा आणि केमिकलसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. हे दोन्ही कारखाने दिल्लीतील करावल नगर येथे आहेत. या घटनेत तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी करावल नगर येथून 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त केला आहे. आरोपी संपूर्ण एनसीआर आणि इतर राज्यात भेसळयुक्त मसाल्यांचा पुरवठा करत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा विभागाने मसाल्यांचे नमुने घेतले आहेत. दिलीप सिंह उर्फ ​​बंटी, सरफराज आणि खुर्शीद मलिक अशी आरोपींची नावं आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक उत्पादक आणि दुकानदार वेगवेगळ्या ब्रँड नावाने भेसळयुक्त मसाले तयार करून दिल्ली-एनसीआरमध्ये विकत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. 

करावल नगरमध्ये भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एका कारखान्यातून दिलीप सिंह आणि खुर्शीद मलिक नावाचे दोन लोक सापडले. हे लोक भेसळयुक्त मसाले तयार करत होते. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने त्यांना पकडले. पोलिसांनी कारखान्यातील मालाची तपासणी केली असता, सडलेला तांदूळ, बाजरी, खराब झालेला नारळ, लाकडाचा भुसा, केमकिल आणि अनेक झाडांच्या सालापासून मसाले तयार केले जात असल्याचे आढळून आले. 

हे मसाले प्रत्येकी 50 किलोच्या मोठ्या पेटीत ठेवून बाजारात विकले जात होते. पथकाने अन्न व सुरक्षा विभागाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. भेसळयुक्त मसाले पश्चिम उत्तर प्रदेश आणि देशातील विविध राज्यांमध्ये पाठवले जात असल्याचं आरोपींनी सांगितलं. करावल नगर येथील या दोन कारखान्यांवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. हे प्रत्येकी 50 किलोच्या बॉक्समध्ये ठेवले जात होते. छाप्यादरम्यान खालील गोष्टी सापडल्या आहेत. 

- 1050 किलो सडलेला तांदूळ- 200 किलो सडलेली बाजरी- 6 किलो खराब नारळ- 720 किलो खराब धणे- 550 किलो खराब हळद- 70 किलो निलगिरीची पाने- 24 किलो सायट्रिक एसिड- 400 किलो लाक़डाचा भूसा- 2150 किलो पशुखाद्य कोंडा- 440 किलो खराब लाल मिरची- 150 किलो मिरचीचे देठ- 5 किलो रासायनिक रंग 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली